June 29, 2025 11:04 pm

रत्नापिंप्रीत विद्यार्थ्यी व पालकांनी केला रास्तारोको

अपनी भाषा में पढ़े! Translate

रत्नापिंप्रीत विद्यार्थ्यी व पालकांनी केला रास्तारोको

संतप्त पालकांनी अमळनेर आगार प्रमुखांना निवेदन दिल्याची करुन दिली आठवण

प्रतिनिधी – मयुर पाटील
रत्नापिंप्री- ता. पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील विद्यार्थ्यांनी आज सकाळी साडे आठ वाजेपासून तर साडे दहा वाजेपर्यंत कुठलीही बस थांबत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी रत्नापिंप्री बस स्थानकावर अर्धा तासाचे रास्तारोको आंदोलन केले यावेळी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी देखील करण्यात आल्या याबाबत सविस्तर वृत्ताचे की विद्यार्थी घरून शाळेत जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजेपासून बस स्थानकावर उभे होते शाळेच्या एक तास पहिले वेळात निघालेले विद्यार्थ्यांना साडे दहा वाजेपर्यंत बसच थांबत नसल्याचे पहात संतप्त विद्यार्थ्यी व पालकांनी रास्ता रोको आंदोलन केले दररोजच्या ह्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना तासंतास उभे राहून देखील बस चालक विद्यार्थ्यांसाठी बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यी व पालकांनी रत्नापिंप्री या ठिकाणी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे तीव्र आंदोलन करत अर्धातास रस्ता रोको आंदोलन केले याबाबत वरिष्ठांना पुर्वी निवेदन देण्यात आले असून देखील हा प्रकार सतत सुरू असतो असे सांगण्यात आले त्यामुळे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व अमळनेर आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेत येत असताना बस स्थानकावर बस थांबत नसल्याची तक्रार करीत विद्यार्थी व पालकांनी रास्ता रोको केली विद्यार्थी तासंनतास या ठिकाणी तात्काळत उभे राहतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते याला एसटी महामंडळ जबाबदार असल्याचे तक्रार पालकांनी केली यावेळी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते आगार प्रमुख पाठक यांच्या शी चर्चा करण्यात आली पाठक यांनी सांगितले की मी याबाबत वाहक व चालक यांना कडक सुचना देऊन बस स्थानकावर बस थांबवावी आणि प्रवाशांना व विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही यासाठी मी प्रयत्न करीन असे आगार प्रमुख पाठक यांनी दिव्य मराठी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले अनेक विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांच्या भेटी प्रसंगी सांगितले की चालक आणि वाहक विद्यार्थ्यांना दमदाटी करून धमकवितात व विद्यार्थ्यी बसून द्या सांगितले तर बस च्या टपवर बसा असे सांगण्यात येते असे सांगितले यामुळे विद्यार्थी व पालकांन मध्ये संताप व्यक्त केला जात होता यावेळी रत्नापिंप्री ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अंकुश भागवत,विकासो संचालक जगदीश मनोरे,गोलू पाटील, सचिन मनोरे, जितेंद्र पाटील, रामचंद्र पाटील , मयुर पाटील, शरद पाटील, किशोर वाघ, यांनी संतप्त नागरिकांना शांत करून वरीष्ठांशी चर्चा करून मार्ग मोकळा करण्यात आला यावेळी बहूसंख्य विद्यार्थ्यी व पालक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!