धर्मवीर आनंद दिघे यांचे त्यांच्या भूतपूर्व शिष्याला पत्र
व्हाया दिलीप मालवणकर
अ’प्रिय,
एकनाथ,
तू माझा स्वयंघोषित पट्टशिष्य आहेस. तू माझ्या आनंद आश्रमाच्या प्रांगणात वावरला. तरी तुला माझी पक्षनिष्ठा कळली नाही का ? अरे, तुला तर नगरसेवक पद, सभागृह नेतेपद,२००४ पासून आमदार, पालक मंत्री, कॉबिनेट मंत्री, जिल्हाप्रमुख पासून काय काय दिले नाही मातोश्रीने ? तूच म्हणतोस की माझ्यावरपण अन्याय केला मग स्वप्नातही पक्षद्रोह करण्याचा विचार माझ्या मनाला शिवला नव्हता.परंतू तू काय केले ? ४० आमदारांना फितवून तू सूरत, गोहत्ती व गोवा मार्गे बंडखोरी केलीस ? तुझी ही कृती आत्मघातकी तर होतीच परंतू माझा शिष्य म्हणवणा-या तुला शोभणारी मुळीच नव्हती.
मी आयुष्यभर भाजपा विरोधात लढलो आणि तू त्याच कपटी भाजपाशी संगनमत करून शिवसेना संपवण्याच्या कटात सामिल झालास ! टेंभी नाका हे आपले नाक तिथे मी विरोधकांना फिरकूही दिले नाही आणि तिथेच तू मोदी,शहांचे बॅनर झळकवतोस व भाजपाची मिंधेगिरी करणारी कमळाची निशाणी मिरवतोस ? तुला काहीच कसे वाटले नाही रे !
माझा आनंद आश्रम हा दु:खी, दीन- दलित- पिडितांचे आश्रयस्थान. तो आश्रम किती साधा सुधा व पवित्र होता. तिथे दिवसरात्र आबालवृद्ध किती हक्काने येत होते, साधु संतांची रिघ लागायची, माता भगिनी हक्काने येत, मुलं शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहित्य घेण्यासाठी येत,इथेच शिवसेनेच्या विजयाची खलबत चालत व विजयी पताका फडकत, भगवा फडकत असे, गुलाल उधळला जात असे. या पवित्र आनंद आश्रमाचा तू अचानक मालक झालास काय आणि त्याचा आत्माच निघुन गेला रे एकनाथ ! आत्ता हा आश्रम मोडून ते कॉर्पोरेट कार्यालय थाटले. दर्शनी भागावरील “आनंद आश्रम” ही मंगल अक्षरं मिटवलीस. इतके करून तुझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही, तू माझे नामोनिशाण मिटवले व तुझे नाव लिहिलेस ? तू किती कपाळ करंटा निघालास ? तुला रिक्षा चालकाचा मंत्री आमदार केला त्याच आनंद आश्रमचे तू चांगलेच पांग फेडलेस. एक लक्षात ठेव एक्क्या, मी जर कधी समोर आलोच तर तुला अशा शिव्या हासडिन ज्या तू माझ्या हयातीत नेहमी ऐकत होतास.
अरे तुला लाज कशी वाटली नाही, आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला ? ज्या आनंद आश्रमात शिवसेनेच्या विजयाचे धोरण ठरत असे व तोरण बांधले जात होते तिथेच बसून तू माझीच शिवसेना संपवण्याची कटकारस्थानं रचतोस ? तू माझा आनंद आश्रम बाटवलास रे एक्या !
माझ्या दरबारात दीन दलित पिडीत व आबालवृद्धांची गर्दी असायची.
तुझ्याकडे येतात ते संधीसाधु
व पद व तिकिट लोलूप स्वार्थी ! जो पर्यंत तुझ्याकडे मुख्यमंत्री पद आहे ना,तोपर्यंतच हे मुंगळे तुला चिकटून राहतील. नंतर तू नावाप्रमाणे एकटाच व अनाथ राहशील. नाही म्हणायला, श्रीकांत आहे, तुझ्या म्हातारपणाची काठी !
तुला चांगले ठाऊक आहे, मला गद्दारी खपत नाही, मी खोपकर प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलो, आणि तू त्या इडीला घाबरलास ? अरे खायचे ते किती ? पचवता आले पाहिजे तितकेच खावे ना ! तू बकासूरासारखा खातच सुटला मग हगवण लागणारच ! तुझो कोण तो सचिन नावाचा पीए त्याला नोटीस काय आली तुझी हात×× फाटली. अरे तू जेलमध्ये जरी गेला असता तर हिरो झाला असतास पण तू इडिला घाबरून झीरो झाला आहेस. तू मुख्यमंत्री झालास पण त्याच्या आधी गद्दारीचा कलंक तुझ्या माथी कायमचा लागला.
आज ना उद्या तू आमदार म्हणून अपात्र होशील परंतू माझा शिष्य म्हणून तू गद्दार झालास त्याच दिवशी अपात्र ठरलास. तू मुख्यमंत्री आहेस म्हणून तुला मी नालायक बोलू शकत नाही किंवा माझ्या पेटंट शिव्याही हासडू शकत नाही. आणि काय रे ? तुझे ते फंटर आमदार किती गरळ ओकतात ? त्यांची लायकी किती आणि बोलतात किती ? मातोश्रीच्या तुकड्यांवर जगलेले हे लोक तुझ्या जीवावर किती भुंकत आहेत. त्यांच्या तोंडाला लगाम घालशील की येऊ त्यांच्या कंबरड्यात लाथ घालायला !
आणि शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ जिथे बाळासाहेबांचा आवाज ४५ वर्षे घुमला, मरगळलेल्या मराठी मनांवर फुंकर मारून ती चेतवली, तिथे तुला दसरा मेळावा घेण्याची बुद्धी कशी झाली ? आपण कितीही मोठं झालो तरी बाप हा बापच असतो, हे तुला कसे कळत नाही.या वर्षी तुला सुबुद्धी झाली, हे बरं झालं ? आत्ता तुझ्या गद्दारीचा अंत व्हायची वेळ आली आहे. तू परतीचे दोर कधीच कापले आहेस ?
तू कधी काळी माझा अनुयायी होतास हे सांगायला मलाच लाज वाटत आहे.
दिल्या घरी तू अपमानीत होऊन रहा, हीच तुला गद्दारीची शिक्षा आहे.
माझ्याकडे गद्दारांना क्षमा नसते !
दिलीप मालवणकर
१२ ऑक्टोबर २०२३