कृषीकन्यांनी केले शेतकऱ्यांना टोमॅटोविषयी मार्गदर्शन
टोमॅटो पिकांवर मायक्रोन्युट्रीयंटची कमतरता व त्यावरील उपायांचे गिरवले धडे
कर्जत:प्रतिनिधी संदीप कायगुडे
दी.१७रोजी गुरवपिंपरी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामतीच्या कृषीकन्या राहिलेल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत त्या गावात विविध डेमो घेतात. प्रीतम अल्हाट, रुचिता दौंडकर, तृप्ती कादे,प्रणोती पाटील, स्नेहल साळुंखे, संस्कृती जाधव यांनी टोमॅटो मध्ये कॅल्शियम व बोरॉनची कमतरता ओळखून शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन केले. मायक्रोन्युट्रीयंटची कमतरता ओळखू न येण्यामुळे आणि त्याचवर उपाय योजना न केल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान बघून कृषीकन्यांनी हा डेमो घायचा ठरवला.
कॅल्शियमची कमतरता असलेली पाने पानांच्या पायाभोवती नेक्रोसिस दर्शवतात. अधिक गंभीरपणे प्रभावित झाडे पिकलेल्या फळांच्या बहराच्या टोकावर गडद, बुडलेले क्षेत्र दर्शवतात.अगोदरच थोडासा बोरॉनच्या कमतरतेसह, पेटीओल्स ठिसूळ असतात आणि अचानक तुटतात, ज्यामुळे उत्पादन कमी होते.बोरॉनच्या तीव्र कमतरतेमुळे, मुख्य अंकुर आणि पार्श्वभूमीचे वाढणारे बिंदू मरतात आणि पीक नष्ट होते.तसेच कॅल्शियमच्या गंभीर कमतरतेमुळे वाढीचा बिंदू मरतो आणि लहान पाने विकृत होतात, परंतु या स्थितीत पानांचे टोक आणि मार्जिन कोमेजून जातात आणि फळे सामान्यतः बहर-शेवट कुजतात. या डेमो ला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेचे मुख्य अधिकारी मा.नलावडे, कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा.एस. व्ही. बुरुंंगले प्राध्यापिका आर.डी. गायकवाड यांनी याविषयी प्रोत्साहन दिले.
यावेळी जयेश सुर्यवंशी,प्रविण टकले, अक्षय टकले, मच्छिंद्र टकले आदीशेतकरीसह कृषी सहायक प्रकाश नवले व गुरुप्रिंपरी गावातील ग्रामस्थही उपस्थित होते.