बाघा RJ मलिष्का चे ते गाणे, संपूर्ण महाराष्ट्रत या गाण्याने घातला धुमाकुळ..!
गेले काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेय. मुंबई लोकल धिम्या गतीनं धावत आहेत. वसई-विरार या ठिकाणी तर इतकं पाणी साचलंय की लोक अगदी होड्यांनी आपापल्या घरी जातानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईकरांना भरलेल्या पाण्यातून वाट काढत वेळेवर ऑफिसला पोहोचावं लागत आहे. अन् याच नोकरदार लोकांची व्यथा प्रसिद्ध RJ मलिष्का हिनं आपल्या गाण्यातून मांडली आहे. ‘कामाला या’ हे गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं पाहून खरंच तुम्ही देखील अवाक् व्हाल.
RJ मलिष्का ही आपल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिनं यापूर्वी मुंबईतल्या खड्ड्यांवर केलेले गाणं तुफान गाजलं होतं. त्यानंतर आता तिनं पावसामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांवर गाणं केलं आहे. मुसळधार पावसातही मुंबईकरांना कामावर जावं लागतं. पण ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना काय काय करामती कराव्या लागतात? कुठल्या संकटांना सामोरं जावं लागतं? या सर्व व्यथा मलिष्कानं आपल्या गाण्यातून मांडल्या आहे. हा व्हिडीओ Red FM India या युट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं अंधेरीत पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत सकाळपासून ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय मुंबईच्या समुद्रात लाटा उसळण्याचा आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.