आज दिनांक २१ जूलै……
बाबासाहेब आंबेडकरांचे अगदी जवळचे व अत्यंत विश्वासू सहकारी
” शांताराम अनाजी उपशाम”
यांच्या “स्मृतिदिनानिमित्त” विनम्र अभिवादन.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे १४ डिसेंबर १९०० रोजी
“शांताराम अनाजी उपशाम ” यांचा जन्म झाला.
“१९३० मध्ये साळुबाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी शिक्षिका होत्या.”
दोन मार्च १९४४ रोजी त्यांच्या “पत्नीचे निधन झाले.” नोकरीत त्यांची पुढे पदोन्नती होऊन १९२५ साली मुख्याध्यापक आणि १९४२ निरीक्षक व शिक्षणाधिकारी झाले.
“महाड येथे १९२७ साली झालेल्या चवदार तळे सत्याग्रहापासून तर अगदी १९५६ ला नागपूर येथे झालेल्या धर्मांतर सोहळ्यापर्यंतच्या डॉक्टर आंबेडकरांच्या प्रत्येक चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला.” बाबासाहेबांच्या संस्थांमध्ये अत्यंत जबाबदारीचे पदे त्यांनी कुठलाही मोबदला न घेता सांभाळली.
७० व्या वर्षी समाजाच्या वतीने बाबासाहेबांचे सुपुत्र भैय्यासाहेबांच्या हस्ते त्यांचा “जाहीर सत्कार ‘ करण्यात आला व मानपत्र अर्पण करण्यात आले.
बाबासाहेबांच्या सोबत असतांना काही
“अनुभव” सांगताना उपशाम …..
१) ” दोष पतीचा की पत्नीचा “
‘एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर दोष पत्नीचा की पतीचा?”
बाबासाहेब एकदा एका खुनाची केस चालविण्यासाठी सोलापूरला गेले. ते “ज्या ठिकाणी उतरले होते, त्या घरात पती व पत्नी अशी दोघेच होती. त्यांना मूलबाळ काही नव्हते.”.
त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याने दुसरी बायको करण्याचे ठरविले होते. त्या बाईने बाबासाहेबांना सांगितले की, ‘बाबासाहेब, कारभारी दुसरी बायको करणार आहेत”
“‘होय का, बरे आहे. मी त्यांना विचारतो”
.’ बाबासाहेबांनी त्या बाईच्या नवऱ्याला बोलावून विचारले, “कारभारी, तुम्ही दुसरी बायको करणार आहात, ही गोष्ट खरी आहे काय?'”
कारभारी म्हणाला, ‘होय बाबासाहेब, “आमच्या लग्नाला ७-८ वर्षे होऊन गेली तरी कारभारणीला मूल होत नाही म्हणून मी दुसरी बायको करण्याचे ठरविले आहे.”‘ बाबासाहेब म्हणाले, ‘
“अहो, मूल होत नाही हा दोष कोणाचा? त्या बाईचा का तुमचा ? ती बाई जर म्हणाली की ‘यांच्याबरोबर लग्न करुन मला ७-८ वर्षे झाली तरी मूल होत नाही, मी दुसरा नवरा करते’ तर तुम्हांला कसे काय वाटेल?”
कारभारी म्हणाले, ‘
“बाबासाहेब मी आता दुसरी बायको करणार नाही.’ बाबासाहेब म्हणाले, ‘तुमची दोघांचीही प्रकृती डॉक्टरला दाखवा. मूल का होत नाही, ते तो पाहिल व योग्य ते इलाज करील.”
२). “बाबासाहेब निर्व्यसनी होते”
बाबासाहेबांना तपकीर ओढणे, विडी सिगारेट ओढणे, दारू-ताडी पिणे यांपैकी “कोणतेच व्यसन नव्हते.” म्हणून ते निर्व्यसनी होते, असे म्हणावयास हरकत नाही.
“मात्र त्यांना कोणते व्यसन नव्हते, असे म्हणता येणार नाही.” “सतत वाचन, हे त्यांचे व्यसनच होते.”
” चांगला पोषाख करणे, हेही त्यांना एक व्यसनच होते.”
” पुस्तकांसाठी व कपड्यांसाठी त्यांचे सर्वात अधिक पैसे खर्च होत. ‘एक नूर आदमी, और दसनूर कपड़ा’ या म्हणीचे ते प्रात्यक्षिक होते. घेतलेले कपडे फाटेपर्यंतच ते कधीच वापरीत नसत.”
३) ” बाबासाहेबांची फसवणूक”
बाबासाहेब मोठे ज्ञानी पुरुष होते. त्यांनी पुष्कळ मोठमोठे ग्रंथ वाचले होते. “मात्र सामान्य लोकांचे व्यवहारज्ञान त्यांना होतेच, असे म्हणता येणार नाही.”
या बारीक सारीक गोष्टीकडे त्यांना कसे लक्ष देता येणार ?
“ते एकदा कसे फसले गेले, त्याबद्दल ते एकदा आम्हांला सांगत होते, *”माझ्या घरात एक तान्हे मूल होते. त्याला वरच्या दुधाची आवश्यकता होती. त्यासाठी एक बकरी विकत घ्यावयाची होती. त्यासाठी एक माणूस एके दिवशी एक बकरी घेऊन आला. त्याने माझ्यासमक्ष बकरीचे दूध काढले. ते चांगले तांब्याभर भरले. या सुरती बकरीची किंमत मी त्याला ३५ रुपये दिले”
. दुसऱ्या दिवशी त्या बकरीचे दूध काढले तर ते अगदीच थोडे निघाले. “शेवटी ती बकरी ५-६ रुपयांस विकावी लागली.”
” (ज्या दिवशी बाबासाहेबांना ती बकरी दाखविली त्या अगोदर तिला तुंबवले होते, हे बाबासाहेबांना कसे समजावे ?)
४). “एकदा बाबासाहेबांच्या डोळ्यांना काही रोग झाला त्यामुळे डॉक्टरने त्यांना वाचन बंद ठेवावयास सांगितले. त्यावेळी त्यांना इतके दुःख झाले की, ते प्रत्यक्ष रडले. व म्हणाले वाचन आहे तोपर्यंत माझे जीवन आहे वाचन बंद झाले तर मी फार दिवस जगणार नाही.”
बाबासाहेब अजन्म विद्यार्थी होते ते या दृष्टीनेच.
५). बाबासाहेब आंबेडकर
पी. एच. डी. झाल्यापासून त्यांच्या नावाच्या अगोदर डॉक्टर ही पदवी आली. ” आमच्या समाजातील नावाच्या अगोदर डॉक्टर ही पदवी लावणारे बाबासाहेब ही पहिलीच व्यक्ती. ”
आमच्या समाजातील स्त्री-पुरुषांना औषधे देणाऱ्या डॉक्टरांचीच तेवढी माहिती होती. त्याशिवाय दुसरा कोणी ‘डॉक्टर” – असतो, याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे एक प्रसंग कसा घडला, ते बाबासाहेब आम्हांला सांगत होते,
“”एके दिवशी सकाळीच एक बाई तापाने फणफणलेल्या आपल्या तान्ह्या मुलाला माझ्याकडे घेऊन आली आणि सांगू लागली की, “डॉक्टरसाहेब, रात्रीपासून माझे मूल तापाने आजारी आहे. याला तपासा आणि औषध द्या.”
” मी तिला काय सांगणार? मी तिला सांगितले की, “बाई, मी औषध देणारा डॉक्टर नाही. तू त्याला दुसऱ्या औषध देणाऱ्या डॉक्टरकडे घेऊन जा.”
बाबासाहेबांनी सांगितल्यावर ती बाई दुसऱ्या औषध देणाऱ्या डॉक्टरकडे गेली असेल.
” मात्र ‘हे कसले डॉक्टर’ हा प्रश्न तिच्या मनात राहिलाच.” बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जी चळवळ केली, अज्ञानी समाजाला जो माणुसकीचा मंत्र शिकविला, ज्ञान प्रसारासाठी जी कॉलेज काढली, त्यावरुन “विद्येचे ते खरे डॉक्टर होते हे सिद्ध झाले.”
महाराष्ट्र शासनाने १९७२ साली प्रथम सुरू केलेला दलित मित्र हा पुरस्कार
“शांताराम अनाजी उपशाम” यांना सर्वप्रथम बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
” जुलै ७५ मध्ये त्यांना अर्धांगवायचा झटका आला व २१ जुलै १९७५ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.”
अशा या बाबासाहेबांच्या सहका-याला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनम्र अभिवादन.
🙏🙏👏👏
” समकालीन सहका-यांच्या आठवणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर”.
पृ . १७५,१७६,१७७,१७८
“विजय सुरवाडे “