राज्यातले पत्रकार असुरक्षित.
प्रतिनिधी / विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे ग्रामपंचायत राड्याची बातमी केल्यानंतर त्या जुन्या बातमीचा राग मनात धरून लोकशाही न्यूज चॅनेलचे पत्रकार विनोद गायकवाड यांच्यावर 5 ते 6 जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना पाटस (ता. दौंड) येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विनोद गायकवाड हे त्यांच्या भावकीतील लग्नसमारंभ आटोपून लग्न मंडपातून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये मार लागला असून त्यांच्या छाती व दंडावरहि जबर मारहाणीच्या खुना दिसत आहेत.गंभीर जखमी झाल्याने पत्रकार विनोद गायकवाड यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पत्रकार संरक्षण कायदा तसेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाअंतर्गत आरोपिंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे. आरोपिंवर कठोर कारवाई न झाल्यास सर्व पत्रकार संघटना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सत्य मांडले म्हणून पत्रकारा वर हल्ला केल्याच्या अनेक घटना राज्यात सध्या घडत आहेत, आज पुन्हा एकदा जुन्या बातमीच्या रागातून पत्रकारावर भर लग्न समारंभात हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आरोपिंवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.