कोल्हापूरच्या शास्त्रीनगर येथील निशा प्रमोद भास्कर वय 36 या त्यांच्या मुलीसह माहेरी पुण्याला निघाल्या होत्या पुणे समोर दिसत असताना पुणे बेंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ पाठीमागून आलेल्या भरदाव ट्रकने ट्रॅव्हल्स ला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात निशा भास्कर यांची माहेरची वाट अर्ध्यावरती संपली. हा अपघात रविवारी 23 तारखेला पहाटे अडीचच्या सुमारास घडला या अपघातात त्यांची मुलगी अधिक प्रमोद भास्कर वय सहा हिच्यासह स्मिता रामचंद्र जहागीरदार वय 52 आणि जयश्री अशोक देसाई या कोल्हापूरच्या महिला जखमी झाल्या आहेत. अपघातात एकूण चौघे ठार झाले असून त्यातील तिघे कोल्हापूरचे आहे तर एकूण 22 प्रवासी जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती मिळताच भास्कर यांच्या नातेवाईकांनी पुण्याकडे धाव घेतली. निशा यांचे माहेरचे नातेवाईक हे रुग्णालयात पोहोचले सायंकाळी त्यांचा मृतदेह कोल्हापुरात पोहोचला. त्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आहे..