June 30, 2025 10:16 am

मदनवाडी गावातील पाण्याच्या जल जीवन योजनेच्या जलस्त्रोताच्या ठिकाणावरून ग्रामसभेत गोंधळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी गावातील पाण्याच्या जल जीवन योजनेच्या जलस्त्रोताच्या ठिकाणावरून ग्रामसभेत गोंधळ

(निलेश गायकवाड )

भारत सरकारने 2020-21 च्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशन किंवा हर घर जल योजना जाहीर केली होती. देशातील सर्व घरांमध्ये पाइपलाइनद्वारे शुद्ध पाणी पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2024 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेवर सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

योजना का सुरू झाली?
आजही देशातील अनेक भागात लोकांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. स्वच्छ पाणी मिळावे म्हणून हे केले जाते. त्यादृष्टीने शासनाने ही योजना सुरू केली आहे.

उद्देश काय?
या योजनेअंतर्गत, 2024 पर्यंत, सरकार देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देईल. घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जातील. याअंतर्गत जलसंधारणासारख्या विषयांवरही काम केले जाणार आहे.

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ग्रामपंचायत साधारण 4500 ते 4800 अंदाजे लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहायला गेले तर 70 % अंदाजे लोकांनी स्वतःच्या पाण्याची खाजगी सोय केली गेली आहे. यातील 30 % लोक हे जे त्यांना कोणताच पर्याय नाही. त्यांना दैनंदिन जीवनात वापराण्याजोगे पाण्यासाठी वणवण करावी लागते. उन्हाळयांच्या दिवसात तर घरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा अजून देखील उताराला नाही. ग्रामपंचायत वर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांची माणसे वर्षानुवर्षे सत्ता मिळवत आहेत. प्रत्येक वेळी गावातील मुख्य पाण्याच्या प्रश्नावर व रस्त्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवली जाते. आणि सत्ता मिळताच गावातील जनतेने दिलेल्या मताची किंमत 0 होते. त्यांना पुन्हा पाच वर्ष परत तेच करावे लागते. थोडक्यात पाण्याचा मुख्य प्रश्न 30% असणाऱ्या जनतेचा हा फक्त घोषणेपुरताच मर्यादित राहतो.

सध्या मदनवाडी गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेसाठी कोट्यावधी निधी मंजूर झाला आहे. यातील मदनवाडी गावातील नागरिकांना स्वच्छ व साफ पाणी या योजनेतून प्रत्येक घरोघरी मिळणार आहे. ही योजना आत्तापर्यंत सर्वात मोठी पाण्यावरती योजना राबविण्यात आली आहे. यामुळे मदनवाडी गावातील नागरिकांचि पाण्यासाठी लोकांची वन वन आता थांबणार आहे. पण सध्या मदनवाडी गावामध्ये या योजनेवरून वाद विवाद व मतभेद पाहायला मिळत आहेत. गावातील झालेल्या ग्रामसभेत जलस्त्रोताच्या ठिकाणावरून नेत्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. या वादामध्ये गावातील काही नेत्यांकडून ही योजना उजनी वरून राबविण्यात यावी आग्रहाची भूमिका धरली. तर काही नेते मंडळींनी ही योजना खडकवासला कॅनलच्या जल स्त्रोताच्या ठिकाणावरून ही योजना राबविण्यात यावी असे दोन भिन्न मते पाहायला मिळाली. सध्या दोन परस्परविरोधी नेते मंडळी मध्ये आज झालेल्या ग्रामसभेमध्ये चांगलाच वाद-विवाद पाहायला मिळाला. झालेल्या वादविवादाचे चर्चा संपूर्ण गावातील होणाऱ्या पाण्याच्या योजनेवरून कट्ट्या कट्ट्यावर रंगू लागली आहे.

गावातील नागरिक या योजनेवरून होणाऱ्या फायद्यामुळे जीवन सुखमय स्वच्छ व पिण्याजोगे पाणी घरोघरी मिळणार असल्याचे आशेने समाधानी आहे. गावातील नागरिकांना आपल्या गावातील पुढाऱ्यांवरती खूप मोठ्या विश्वासाने पाहत आहेत . कारण ते ज्या परिस्थितीमधून जात असल्याचे चित्र वर्षानुवर्ष आपल्या गावातील महिलांच्या डोक्यावरील हंड्यामुळे ग्रासून गेलेले असल्यामुळे त्यांच्याकडून या योजनेवरून होत असलेल्या नेतेमंडळींच्या वाद विवादामध्ये या योजनेचा विपर्यास होऊ नये सदर योजना दाखवण्यापूर्ती राहू नये. अशी भीती होत असलेल्या नेते मंडळींच्या जलस्त्रोताच्या ठिकाणावरून वाद विकोपाला न जाता एकोप्याने मार्ग काढत सदर योजना योग्य पद्धतीने राबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.

गावातील पुढाऱ्यांनी व नेते मंडळींनी गावाच्या पुढील भविष्यातील दूरदृष्टीने जर वाटचाल ठेवली तर कितीतरी प्रश्न गावातील मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रामध्ये आपले हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या विकासाच्या वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. गावाच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी विचार केला पाहिजे. शेवटी आतापर्यंत जे पाहायला मिळालं तेच जर पुढील काळामध्ये होत असेल तर गावाच्या दृष्टीकोनाने घातक आहे….. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन गावासाठी लढले पाहिजे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!