विद्युत महावितरणच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना झाली आक्रमक
चक्का जाम करून केले आंदोलन…..
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो नं. 8446119158
दौंड - दौंड मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी करू नये, केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा करावा, उसाच्या एफआरपीप्रमाणे इतर सर्वच शेतीमालाला हमीभाव कायद्याचे संरक्षण राहील, शेतकऱ्याला शेतीपंपाला दिवसात बारा तास विना कपात वीज मिळावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले ५०,००० रुपये अनुदान कोणत्याही अटीशर्ती शिवाय तात्काळ त्याच्या बँक खात्यात जमा करावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काठामारीतून लूट होत आहे यासाठी देशातील सर्व साखर कारखान्यांचे ऊसाचे वजन काटे डिजिटल ऑनलाइन करावे आणि ते त्यावर थेट नियंत्रण साखर आयुक्त यांचे असावे अशी मागणी केली आहे.याकरिता विविध मार्गाने निवेदन देऊन आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकदा केला, परंतु सरकारने कोणताही ठोस निर्णय आजपर्यंत घेतला नाही. उलट मार्च 2023 पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी विज बिल भरा नाहीतर आपला वीजपुरवठा खंडित करून वसुली केली जाईल असा इशारा दिला अगदी त्याचप्रमाणे सुलतानी पठाणी वसुली आज तागायत सुरू आहे, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झाला आहे.केंद्र सरकारने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा व तसा कायदा संसदेत मंजूर करावा म्हणून आज पर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देश पातळीवर आंदोलन सुरू आहे राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी बुधवारी दि 22 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या हितासाठी देऊळगाव राजे हिंगणी चौक ता. दौंड जि.पुणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी आत्मसन्मानासाठी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम व राजू शेट्टी यांच्या आदेशाने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.