तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याला राजकीय स्वार्थापायी पायाखाली रगडायच काम करत असाल तर येणाऱ्या काळात त्याच शेतकऱ्याच्या पायावर आणण्याचं काम मी करेल प्रस्तापित साखरसम्राटाणा सतीश घाटगे यांचा इशारा.
जालना (संतोष शिंदे)/- दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा शाखा उद्घाटन् व असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश सोहळा सोमवार दिनांक ३० जानेवारी रोजी बाणेगाव येथे शिवसेनुतन् व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन शेकडो युवकांनी समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय सतिषराव घाटगे पाटील चेअरमन समृद्धी साखर कारखाना तथा भाजप नेते यांच्या उपस्थित पार पडला.यावेळी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच पुरुषोत्तम उढाण यांच्या सह माजी ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्यासह उपसरपंच मुकूंद उढाण, भरत उढाण, भाऊसाहेब उढाण,सुदाम जाधव, महादेव जंगले,सुदाम उढाण, रामेश्वर लहाने, कृष्णा लहाने, सुनील उढाण,विक्रम जंगले, बाप्पासाहेब घुमरे,सुदाम उढाण, नानाभाऊ गोरे,गणेश फलके, रामनाथ उढाण, ईश्वर उढाण, विष्णू उढाण,अंगद उढाण, अशोक डोंगरे, अशोक उढाण, चक्रधर पांजरे, संतोष जाधव, लक्ष्मण गोरे, लक्ष्मण उढाण, विष्णू कदम, दत्ता उढाण, अविनाश जाधव, अंकुश कारके, प्रदीप फलके,डिगांबर उढाण,भागवत उढाण, गणेश तळेकर, यांच्या सह अनेक युवक व जेष्ठ नागरिकांनी प्रवेश मा घाटगे साहेब् यांच्या हस्ते भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला .
सर्व शेतकरी यांच्या वतीने साहेबांची सजाविलेल्या बैलगाडीतून गावात मिरवणूक काढली.
घाटगे साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण जी ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक केली यापुढे कदापि खपून घेतली जाणार नाही .ज्या ज्या ठिकाणी शेताकऱ्याला अडवण्याचे काम केले जाईल त्या ठिकाणी त्यांना त्या अडचणीतून सोडवण्याचं काम समृद्धी साखर कारखाना व भाजप पक्षाच्या माध्यमातून केले जाईल.विकासाच्या बाबतीत बोलताना मा साहेबानी सांगितले की मुर्मा ते भोगगाव च्या जनतेचे दुर्दैव आहे की 25 वर्षांपासून ज्यांना सगळे पदे भोगण्याची संधी दिली त्यांनी कधीच या रस्त्याची दखल घेतली नाही . हे फक्त निवडणूक आली की गाजर दाखवण्याचे काम करतात.स्पर्धा करायची असेल तर शेतकऱ्याच्या हिताची केली पाहिजे. महाराष्ट्रात पहिला समृद्दी कारखाना आहे की जो ऊस सभासद असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात 1क्विटलं साखर मोफत देतो .. तो शेतकऱ्यावर उपकार नाही तर ज्या शेतकर्याने रात्र दिवस रक्ताचे पाणी करून ऊस पिकवला त्या मुलीच्या लग्नासाठी एक कन्यादान म्हणून भेट म्हणावी लागेल.तालुक्यात कित्येक ठिकाणी शेतात स्मृद्धी कारखान्यामार्फत रस्ते सुरु आहेत अनेक रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रात आणी राज्यात भाजप चे सरकार असल्यामुळे तालुका कसा विकासाकडे नेता येईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील. यावेळी ऊस तोड व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक् व मुकादम यांचा देखील मा साहेबानी सत्कार केला.कोणत्याही दबावाला बळी पडू नका पक्ष तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे पक्ष वाढीसाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आव्हान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना साहेबानी केले .
यावेळी मंचावर अंकुशराव बोबडे जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा,सुरेशराव काळे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, गणेश पघळ, अंबादास गोरे,बालाजी खोजे ,राहुल कणके भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,रामेश्वर गरड,पिराजी गायकवाड,परमेश्वर कसाब,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुदाम जाधव यांनी केले तसेच अंकुशराव बोबडे,सुरेश काळे,पुरुषोत्तम उढान्, गणेश पघळ यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन बाबा उढान यांनी केले.