मदनवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा कभी गरम,कभी नरम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
( निलेश गायकवाड )
भिगवण -मदनवाडी गावची प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित केलेली ग्रामसभा अतिशय गरम वातावरणात पार पडली असली तरी गावच्या संस्कृतीला कोठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत शासकिय नियमांचा आदर राखत कधी गरम तर कधी नरम भावना ठेवत पार पडल्याने समाधान व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकी नंतर पहिलीच ग्रामसभा असल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते ग्रामसभेत पिण्याच्या पाण्यावर वादळी चर्चा झाली असली तरी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामसेवक गाताडे यांनी दिल्याने ग्रामस्थांनी पुढील ग्रामसभेत पर्यंत मार्गी लावाला असे सांगितले. ( ग्रामसभेला ग्रामसेवकांच्यासह कोणीअधिकारीच नसल्याने तापलेल्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, आणि ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार दिण्याचा ठराव केला मात्र तब्बल एक तासानंतर ग्रामसेवक सभेला हजर झाले आणि येताच क्षणी ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त केल्याने ग्रामसेवक सोडुन गावातील ईतर सर्व शासकिय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा ठराव करण्यात आला ) मदनवाडी गावातील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने सर्वांचे प्रस्ताव तयार करावेत असे एक मताने ठरविण्यात आले. मात्र घरकुल लाभार्थ्यांना जागेची उपलब्धता नसल्याने त्यांना गायरान मधील जागा देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि गायरान मधील आगोदरचे अतिक्रमण काढण्यासाठी जागा मोजणी करुन घ्यावी असे ग्रामस्थांनी सुचविले.
जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत सावता माळी, आण्णाभाउ साठे यांची स्मारक उभे करावीत आणि गावातील प्रत्येक वार्डला त्यांचे नाव द्यावे अशी सुचना केली या सुचनेचे सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजऊन स्वागत केले
यावेळी ग्रामसभेला कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते,जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात,निलेश देवकाते,दिपक बंडगर,रोशन देवकाते,माउली मारकड,रमेश आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते तर उपसरपंच प्रतिनिधी राजेंद्र देवकाते यांनी स्वागत केले तर सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर यांनी आभार व्यक्त केले.