पराग जाधव यांनी हिंदू खाटीक समाज संघटनेला स्वखर्चाने बोअर घेऊन देत पूजन केले
(निलेश गायकवाड)
उन्हाळा सुरू होऊ असताना उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसून येत आहेत. बहुतांश ठिकाणी विहीर, बोअरवेलची पाणीपातळी खालावली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये महिला, ग्रामस्थांवर हीच ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन येथील तसेच हिंदू खाटीक समाज संघटना भिगवण येथील समज्याच्या जागेत समज्याच्या वतीने मागणी करण्यात आली बोअर साठी त्या मागणीला अनुसरून मा. उपसभापाती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच माजी ग्रामपंचायत सरपंच पराग जाधव यांनी स्वखर्चाने बोअर घेऊन सहकार्यासोबत पूजन करण्यात आले.
यावेळी प्रसंगी देवानंद गुरुजी शेलार,सत्यवान भोसले,अमित कुमार वाघ,तानाजी वायसे,दत्ता धवडे तसेच सर्व समाज बांधव व ग्रामस्था उपस्थित होते. बोअर घेतल्यानंतर पाणी देखील लागले. यामुळे समाज बांधवानी समाधान देखील व्यक्त केले. पराग जाधव यांचा समज्याच्या वतीने यथोचित सन्मान देखील करण्यात आला.