शिरपूर शहर हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते पण या शहरातील तहसील कार्यालय गुटखा पान खाऊन थुंकून मोठ्या प्रमाणावर घाण केलेली दिसून येत आहे. शासनाच्या आदेशान्वय धुळे नव्हे तर जिल्ह्यातील शाळा शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तरी देखील शासकीय कार्यालयातच अस्वच्छता करणाऱ्यावर तहसीलदार साहेब कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. व माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनातून राज्यात शिरपूर शहर स्वच्छता मोहिमेत अनेकदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. पण या शहरातील सरकारी कार्यालय मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा तंबाखू पान खाऊन तहसील कार्यालय ठीक ठिकाणी भिंती स्वच्छतागृह मध्ये मोठ्या प्रमाणावर घाण दिसून येत आहे यामुळे हे कार्यालय शिरपूर शहरातील की बाहेरील असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिरपूर तहसील कार्यालयातील प्रवेश करतानाच आजूबाजूच्या भिंती कार्यालयाच्या मधील स्वच्छतागृहातील एकही कोपरा तुम्हाला गुटखा तंबाखू व पान खाऊन मोठ्या प्रमाणावर भिंती व कोपरे थुंकलेले दिसून येत आहे. तसेच तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व कार्यालय तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तरीदेखील शिरपूर तहसील कार्यालयात च्या आवारात नाही तर कार्यालयाच्या मध्येच मोठ्या प्रमाणावर गुटखा तंबाखू खाऊन मोठ्या प्रमाणावर थुंकलेले आढळून आले आहे यामुळे या मोहिमेचा शासकीय कार्यालयातूनच बट्ट्याबोर्ड होत असेल तर इतर ठिकाणी याची काय अवस्था असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तहसीलदार कार्यालयात ठोकणारे कर्मचारी की बाहेरील येणारे नागरिक याबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे जर बाहेरील नागरिक तहसील कार्यालयात येऊन असे प्रत्येक करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे ही गरजेचे आहे. तर कार्यालयीन कर्मचारी जर कार्यालयात घाण करत असेल त्याच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.