June 29, 2025 4:32 am

शाश्वत विकासाला गती देणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ यांनी संसद भवन येथे मांडलेल्या प्रश्नाचे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून कौतुक.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शाश्वत विकासाला गती देणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ यांनी संसद भवन येथे मांडलेल्या प्रश्नाचे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून कौतुक.

 

अमळनेर विक्की जाधव 

जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत केली. तर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून केळी पिकाला बघितले जाते ह्या पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे उत्पादक शेतकरी वर्गाला. निर्यातीत शासकीय सवलती तसेच पीकविमा आणि बाजार भावात मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. ही मागणी गेल्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे खा. स्मिता वाघ यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले. ह्या पिकाला फळाचा दर्जा मिळाल्यानंतर केळी उत्पादक. शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. तसेच याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यांवा अशी मागणी खा. वाघ यांनी केली. दरम्यान संसदेत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कृषी प्रश्नाला वाचा फोडल्याने खासदारांचे सर्वत्र शेतकरी वर्गाकडून कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!