शिरूड येथील उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदा च्या शपथविधी साठी आमंत्रित..
अमळनेर : विक्की जाधव.
उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमा अंतर्गत दि.२५ फेब्रुवारीला त्यांनी केलेल्या कामाबाबत प्रत्यक्ष फोनवर संवाद केला होता.
ग्रामविकासात कल्याणी पाटील यांनी जलसंधारण, मृदसंधारण, सेंद्रिय शेती यावर विशेष भर दिला आहे.याचे प्रसारण दूरदर्शन वर व रेडिओवर देशभरात करण्यात आले.
काल संध्याकाळी कल्याणी पाटील यांना पंतप्रधान कार्यालयातून दुरध्वनी वरून कळविण्यात आले. मागील काळातील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कार्यालयातून त्यांना सदर आमंत्रणाचा पास मिळणार आहे. कल्याणी पाटील यांच्या सह त्यांचे पती प्रफुल्ल पंडित पाटील यांनाही सदर महत्वपूर्ण सोहळ्याला बोलवण्यात आले आहे. ते आज दिल्ली साठी रवाना झाल्या आहेत.