महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावरून जनतेत संताप; विधेयक रद्द करण्याची अमळनेरात मागण
अमळनेर : विक्की जाधव.
‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०१४’ (कायदा) राबविण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांविरोधात नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीविरोधी व जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, या कायद्याच्या आडून शासनावर टीका करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना, कार्यकर्त्यांना व नागरिकांना अटकसत्रे, दडपशाही व खोट्या कारवायांना सामोरे जावे लागेल. समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प बसवण्यासाठी हा कायदा हुकुमशाहीचे हत्यार ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विविध संघटना व विरोधी पक्षांनी देखील त्याचा तीव्र निषेध केला आहे. सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.