शिरपूर तालुका सकल हिंदू समाजातर्फे राहुल गांधीस चप्पल मार आंदोलन
शिरपूर : आम्ही सकल हिंदू समाज शिरपूर तालुका यांच्या वतीने आपल्याकडे एक अत्यंत गंभीर विषयाकडे लक्ष वेधत आहोत, संसदेत नुकत्याच झालेल्या एका चर्चे दरम्यान काँगेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी हिंदू समुदायाविषयी केलेल्या अत्यंत आक्षेप घेणारे वक्त्यामुळे आम्हा कोट्यावधी हिंदूना वेदना झाल्या आहेत. त्यांनी हिंदूना हिंसक, खोटारडे, आणि द्वेष निर्माण करणारे असे संबोधिले आहे. त्यामुळे आमच्यासह संपूर्ण जगातील हिंदूच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण सनातनीमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे वक्तव्य लोकसभेतील दूरचित्रवाहिनी द्वारे प्रक्षेपण झाल्यामुळे जगभरातील लोकांपर्यन्त पोहचले आहे. त्यामुळे जगभरात सहिष्णू हिंदू समाजाची नाहक बदनामी झाली आहे.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी व त्यांच्या काँगेस पक्षाने पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे असे नाही. तर यापूर्वी त्यांनी भगवा आतंकवाद व हिंदू दहशतवाद असा खोटा सिंध्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काँगेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरात जाणे, आणि हातावर पवित्र धागा बांधणे ही शुध्द फसवणूक होती हे सिध्द झाले आहे.
वर्ष १९९० च्या दशकात कश्मिरी हिंदूना कश्मिर मधून कोणी विस्थापीत केले ? कोणत्या समाजाने हे विस्थापन केले हे राहूल गांधी सांगतील का ? सर तन से जुदा चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूचे गळे कापणारे कोन होते हे राहूल गांधी सांगतील का ? मणिपूर मध्ये हजारो सहिष्णू मैतेही समाजावर आक्रमण करुन त्यांना विस्थापित करणारे कोण आहेत हे राहूल गांधी कधी का सांगत नाहीत ? श्रीराम नवमी, हनुमान जयंती, नवरात्री, महाशिवरात्री, हिंदू नववर्ष आदी हिंदू सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूना ठार मारणारे, देवी देवतांच्या मुर्ती फोडणारे, कोण होते यावर राहूल गांधी कधी बोलत का नाहीत ? दहशतवादी हल्ल्यात हजारो निष्पाप लोक मारले गेले त्या दहशतवादाचा रंग कोणता ? हे राहूल गांधीनी कधी सांगितले नाही.
सर्वात प्राचिन व सनातन असलेला हिंदू धर्म हा सहिष्णू असल्याने अन्य संप्रदायांवर साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्म परिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केली नाहीत, पैश्यांचा जोरावर कोधी कोणाचा संप्रदाय बाटविला नाही. उलट जागतिक हिंदू समाज हा सार्वत्रिक शांतता आणि कल्याणाच्या विचारधारेसाठी ओळखला जातो. “वसुदैव कुटुंबकम” किंवा संपूर्ण जग एक कुटूंब या तत्वाचे प्रतिनिधीत्व करतो. या समाजाला हिंसक, खोटारडा किंवा दहशतवादी चे लेबल लावणे ही हिंदू धर्माची जगभरात प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे.
एका राष्ट्रीय पातळीवरील नेत्याकडून आलेले हे विधान अत्यंत अनुचित व समाजासमाजात फूट पाडणारे आहे. तसेच हिंदू समाजाला जगभर बदनाम करण्याचे विदेशी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र भारताच्या लोकसभेच विरोधी पक्ष नेते म्हणून राहूल गांधी मदत करीत आहे. ज्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या विधानामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. तरी आम्ही खालील सहया करणारे आपणास विनंती करतो की, राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करुन त्यांची विदेशी फंडीग ची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करणेत यावी असे निवेदन सकल हिंदू समाज शिरपूर तालुका तर्फे मा. तहसिलदार यांना देण्यात आले.