गणेशवाडी मध्ये वाढला डेंगूचा प्रादुर्भाव
प्राथमिक आरोग्य केंद्राची गावकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत तालुक्यातील गणेशवाडी मध्ये डेंगू च्या आजाराने जवळपास 40 ते 50 नागरिक सध्या त्रस्त आहेत ते विविध ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नसल्याकारणाने विविध ठिकाणी सांडपाणी साचले जात आहे. त्यावर ग्रामपंचायत मात्र नाममात्र बोलत नाही. गटारी झाले आहेत परंतु त्या गटारीचा काडीमात्र उपयोग होताना दिसत नाही. किंबहुना त्या उपयोगाच्या नाहीत.
नागरिकांनी आरोग्याच्या तक्रारी ग्रामपंचायतचा वेळोवेळी दिल्या आहेत. याबाबतच्या सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायतकडुन मात्र याची दखल घेतली गेली नाही.
सध्या गणेशवाडी मध्ये प्रत्येक वार्ड मध्ये दहा ते पंधरा पेशंट डेंगू चे सापडत आहेत ते भिगवन, बारामती, राशीन, दौंड अशा विविध शहरी भागात खासगी रुग्णालयात आपला उपचार करत आहेत. एका रुग्णस दवाखान्याचा किमान खर्च 50 ते 70 हजार येत आसल्याने संसाराची तूटपुंणजी कशी भागवावी हा प्रश्न रुग्णांच्या घरच्यांना पडला आहे. ग्रामीण भागातल्या उद्भवलेल्या या समस्येवर प्रशासकीय यंत्रणा मात्र तोंडात बोट घालून गप्प बसले आहे.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याकारणाने नागरिकांची आरोग्याचे हेळसांड कायमच होत आसतान दिसत आहे.
या आजाराने एखादा रुग्ण दगावण्याच्या अगोदर यावर योग्य असे उपचार कायमस्वरूपी उपाय पद्धती केल्या जावोत.
गावात डेंगु मच्छरांचा प्रदुभाव आल्याने फवारणीसह,सांडपाण्याची आवश्यक त्या सोयी करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.