June 30, 2025 5:19 am

उसाचे पाचट न जाळु नका कृषीकन्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

उसाचे पाचट न जाळु नका कृषीकन्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
” ऊस शेती उत्तम सेंद्रिय शेती “विषयी कृषीकन्यांचे धांडेवाडी मार्गदर्शन
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:धांडेवाडी,जि.नगर बारामतीतील डॉ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यलयातील कृषीकन्या ग्रामीण कृषी कर्यानुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत ” उसाचे पाचट न जाळता, सेंद्रिय खत बनवण्याविषयी मार्गदर्शन” या विषयावर प्रात्यक्षिक केले.
उस तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट (SugarCane Trash ) जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया जातात. शिवाय जमीन भाजली गेल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा नाश होतो. पाचट जाळण्याची मानसिकता बदलून पाचटापासून सेंद्रिय खत तयार केल्यास त्यातून खताची उपलब्धता होऊ शकते. ऊस उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रासायनिक खतांचा असंतुलित पद्धतीने वापर केला जातो. त्यातून ऊस पिकाखालील क्षेत्र क्षारपड होण्याचा धोका आहे. उसापासून दर हेक्टरी ७ ते ८ टन पाचट उपलब्ध होते. या पाचटाचे सेंद्रिय खत बनविणे हा चांगला पर्याय आहे.याबाबत कृषिकंंन्या भारती सराटे,जयश्री यादव,राजलक्ष्मी राऊत,इशा वाळुंज, सुस्मिता मुलगापती,वप्पला साईश्री यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले .यावेळी त्या ठिकाणी दादासाहेब धांडे, मनिषा धांडे, कमल धांडे, रतन धांडे, स्वाती धांडे, पल्लवी धांडे,उषा धांडे, शिवलिंग धांडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!