बर्गेवाडीत कृषी कन्यांनी केले शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत : बर्गेवाडी (ता. कर्जत जि. अहमदनगर) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत आलेल्या कृषी कन्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले .या कृषी कन्या येथील शेतकऱ्यांना शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची माहिती देणार आहेत .
या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्री अनिल गवळी सर तसेच तालुका कृषी अधिकारी श्री म्हस्के सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .यांनी शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना समजावून सांगितल्या त्यामध्ये अवजार बँक ,ठिबक सिंचन ,कांदा चाळ ,अस्तरीकरण ,मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना इ.बद्दल योग्य मार्गदर्शन केले .
बर्गेवाडी येथे कृषी महाविद्यालय बारामती चतुर्थ वर्षातील कृषिकन्या आलेल्या आहेत यामध्ये मोहिनी ठुबे ,आदिती जाधव ,अंजली दहातोंडे ,भारती मिसाळ, रवालिका कल्याणपु,श्रीजा रेड्डी या सहा कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील बापूसाहेब नेटके, कुषाभाऊ नेटके, रामदास परहर, विजय नेटके ,धीरज पडोळे, दादासाहेब पठाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.