जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण आवश्यक..
कर्जत: जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण करण्याच्या सल्ला कृषीकन्यांनी धांडेवाडी ( ता. कर्जत) येथील शेतकर्यांना दिला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न बारामतीतील डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनींकडून धांडेवाडीतील शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील अनेक प्रगतशील शेतकर्यांनी व ग्रामस्थांनी हजेरी लावली. या दरम्यान कृषी कन्या भारती सराटे , जयश्री यादव, राजलक्ष्मी राऊत, ईशा वाळुंज, सुस्मिता मुलगापत्ती, साईश्री वप्पल्ला यांनी माती परीक्षण व मातीच्या आरोग्याबाबत माहिती शेतकर्यांना दिली. माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी दादासाहेब धांडे, सुनिल धांडे, ईश्वर धांडे, स्वाती धांडे, कमल धांडे, गोधड धांडे, आदी शेतकरी उपस्थित होते. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सुक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू इत्यादींची माहिती मिळते, असे कृषीकन्यांनी सांगीतले.