सटवाईनेच तुमच्या दुर्देवाचे दशावतार लिहून ठेवले आहेत, त्याला तुम्ही तरी काय करणार ?
एकनाथ शिंदे बोलला होता मी दिघेसाहेबांच्या मृत्यू बद्धल बोललो तर भूकंप होईल.मग कालच्या सभेत ही संधी का साधली नाही ? कि भाजपा स्क्रिप्टमधे ते लिहून द्यायला विसरला.
मेळाव्यात उत्स्फूर्तपणे भाषण करायचे असते पण हा तर बोलवित्या घन्याने लिहून दिलेले भाषण वाचताना पण अडखळत होता.
आणि हो, दिघे साहेब वारल्यानंतर रॉबिनहूड प्रमाणे त्यांचा मृतदेह खांद्यावर उचलून आणला होता, ते कपोलकल्पित नाटकी प्रसंग सांगायलाही विसरला वाटतं ?
दिघे साहेब न्यायनिवाडा करताना अन्याय करणाऱ्या ला गाडून टाकत, दिघे साहेबांचे धोरण, गद्दारांना क्षमा नाही, हे का बोलला नाहीत भाषणात ?
ज्या वृक्षाची फळं खाल्ली तो कल्पवृक्ष तोडायला निघालात ? असा कृतघ्नपणा कोणीच केला नसेल. एक वेळ रिक्षावाला म्हणवून घेणे चालले असते पण आत्ता गद्दारीचा कलंक घेऊन जगावे लागेल व तो कलंक तुमच्या पश्चातही कायम राहिल. इडीतून वाचण्यासाठी कित्ती कित्ती गद्दारी व भाजपाची हूजरेगिरी व चाटुगिरी करणार ? शिवाजी महाराजांनी तर खंडोजी खोपडे सारखा चौरंग केला असता. नशीब आत्ता शिवशाही नाही पण कुदरत का कानून आजही आहे. गद्दारांना क्षमा नाही म्हणजे नाही.
येणा-या काळात तुमच्या नशीबी दुर्दैवाचे दशावतार सटवाईनेच लिहून ठेवले असावेत, नाईलाज को क्या इलाज!आपल्या कर्माची फळं भोगायची मानसिक तयारी करून ठेवा. आम्ही कट्टर शिवसैनिक त्या सुदिनाची आतूरतेने वाट पाहत आहोत !
दिलीप मालवणकर
9822902470