June 29, 2025 3:41 pm

आ. अमरिशभाई पटेल हे दूरदृष्टीचे नेते – ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे गौरवोद्गार

अपनी भाषा में पढ़े! Translate

आ. अमरिशभाई पटेल भाजपात आल्याने भाजपाची ताकद शत प्रतिशत वाढली – ना. गिरीशभाऊ महाजन यांचे गौरवोद्गार

शिरपूर येथे ना. विजयकुमार गावित व ना. गिरीषभाऊ महाजन यांचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न

शिरपूर : आ. अमरिशभाई पटेल हे दूरदृष्टीचे नेते असून त्यांनी शिरपूर तालुक्यात केलेल्या विकास कामांना तोंड नाही सर्वच क्षेत्रात ते आदर्श नेते आहेत असे गौरवोद्गार ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी काढले. तसेच आ. अमरिशभाई पटेल भाजपात आल्याने भाजपाची ताकद शत प्रतिशत वाढली असे ना. गिरीशभाऊ महाजन यांनी गौरवोद्गार काढून भाईंच्या कार्याचा गौरव केला.शिरपूर येथे ना. विजयकुमार गावित व ना. गिरीषभाऊ महाजन यांचा जाहीर सत्कार सोहळा 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

यावेळी ना. डॉ. विजयकुमार गावित मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, भाईंची दूरदृष्टी आहे. शिरपूर, मुंबई व देशभरात त्यांचे शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, पाण्याचे काम अफाट आहे. त्यांनी नुसत्या इमारती उभारल्या नाहीत तर आत्मा ओतुन काम करतात. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मनापासून काम करतात. आदिवासी भागात पाण्याचे काम करण्यासाठी भाईना सहकार्य करु. राज्यात कुपोषण दूर करण्यासाठी तसेच येत्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी प्रयत्न करु. जात पळताळणीचे काम मोठ्या प्रमाणात होत असून विविध योजना आदिवासी विभागा मार्फत पूर्ण करु या. दोन्ही जिल्हे पूर्णपणे भाजपमय करु या. प्रत्येक घराला नळ योजना व शिरपूर तालुक्यात, आदिवासी भागाला 100 टक्के मागण्या पूर्ण करेन. भाई यांच्या अपेक्षे प्रमाणे आम्ही शासनाचे पाठबळ देऊ. वनविभाग व आदिवासी विभागातील धरणे, अनेक प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन ना डॉ विजयकुमारगावित यांनी दिले.मंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले, भाई यांच्या कडेच आम्ही नेहमी मागतो, शिरपूर यायला नेहमी उत्सुकता असते. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट नियोजन खूप कौतुक करण्यासारखे आहे. एस. व्ही. के. एम. देशातील नामांकित संस्था असून भाई यांचे अतुलनीय व अभिनंदणीय कार्य आहे. औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक तसेच आता मेडिकल क्षेत्रात लक्ष घालत आहेत. मुंबई सारख्या अत्याधुनिक हॉस्पिटलची शिरपूर येथे भाई व्यवस्था करत असून तालुक्यातील जनता, कार्यकर्ते नशीबवान आहेत.

पालक मंत्री म्हणून निश्चितच जिल्ह्याच्या अपेक्षा पूर्ण करेन. भाई यांचे मन मोठे आहे, राज्यातील व देशातील भाजपाचे सर्व नेते भाईंचे कौतुक करतात. धुळे जिल्हा 100 टक्के भाजपामय झाला, सर्व नेते प्रभावी आहेत. थेट माणसाच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम,सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहे. धुळे जिल्हा विकसित करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करु या. अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल असे आश्वासन ना गिरीश महाजन यांनी दिले.महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री, नंदुरबार जिल्हा पालकमंत्री ना. विजयकुमार गावित तसेच ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री गिरीषभाऊ महाजन यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा 3 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी दुपारी 12.30 वाजता आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या ग्राऊँडवर, करवंद नाका जवळ, शिरपूर येथे समारंभपूर्वक संपन्न झाला.हा सत्कार सोहळा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. हिनाताई गावित, माजी रोजगार हमी व पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल, आ. काशिराम पावरा, आ. राजेश पाडवी, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रभाकरराव चव्हाण, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुमताई निकम, सभापती मंगलाताई पाटील, समाज कल्याण सभापती मोगराताई पाडवी, महिला व बालकल्याण सभापती सौ. धरती देवरे, महापौर प्रदिप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, संग्राम पाटील, शिवाजीराव दहिते, सुभाष देवरे,सुरेश पाटील, शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा शिरपूर शहराध्यक्ष हेमंत पाटील, मनुदादा पाटील, देवेंद्र पाटील, के. डी. पाटील, दिलीप लोहार, प्रा. अरविंद जाधव, स्थायी सभापती शितल नवले, राम भदाणे, नरेंद्रसिंग सिसोदिया, नरेंद्रसिंग जमादार, सौ. शुभांगी पाटील, राजगोपाल भंडारी, राहुल दंदे, अरुण धोबी, संजय आसापुरे, एन. डी. पाटील, मोनिका शेटे, श्यामकांत ईशी, संजय चौधरी, भालेराव माळी, आकाश मराठे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, नगरसेविका, तालुक्यातील मान्यवर, महिला, पुरूष, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात शिरपूर तालुक्यातील 33 पैकी 32 नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मिलिंद पाटील हिंगोणी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिरीष पाटील, कुंदन पाटील हिंगोणी, प्रविण पाटील शिंगावे, धीरज पाटील, संभाजी पाटील, सुनिल पाटील शिंगावे, सुरेश पाटील, रमाकांत पाटील, आनंदा पाटील, मुकेश पाटील, अमृत पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी आ. अमरिशभाई पटेल म्हणाले, तालुक्यात आदिवासी भागात जुने बंधारे, वन विभाग परिसरात पाझर तलाव, अनेक समस्या असून वनवासी, आदिवासी बांधव यांना सहकार्य करा, माती घ्यायची त्यांना परवानगी द्या. जात पळताडणीचे काम वेगाने करून शिरपूर येथे त्याचे कार्यालय व्हावे. शिरपूर पॅटर्न अंतर्गत आजपर्यंत 300 बंधारे स्वतः बांधले. भूजल पातळी वाढली, नदी मध्ये एक थेंब पाणी देखील जाऊ देत नाही अशी व्यवस्था, यंत्रणा उभारली आहे. अजून अनेक कामांमध्ये शासनाकडून अपेक्षा असून अत्याधुनिक हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज साठी शासन स्तरावर योग्य सहकार्य करावे. सर्व आमदार भाजपाचे निवडून येतील असा आशावाद भाईनी यावेळी व्यक्त केला.

खा. डॉ. हीनाताई गावित म्हणाल्या, शिरपूर तालुक्यासाठी मोठा निधी शासनाकडून देण्यासाठी दोन्ही मंत्री महोदय लक्ष घालतील अशी अपेक्षा. भाईसाहेब यांनी खूप कामे केली आहेत, ग्रामविकास व आदिवासी मंत्री यांनी लक्ष घालावे. आदिवासी भागातील सर्व जुने धरणे बाबत लक्ष घालून आदिवासी व इतर स्थलांतर थांबण्यासाठी प्रयत्न व्हावे. पंतप्रधान घरकुल योजना प्रभावीपणे राबविली जावी, बेघर व गरजूना घर मिळावे.आ. जयकुमार रावल म्हणाले, गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारने महाराष्ट्राचे नुकसान केले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याला हक्काचे मंत्री मिळाले. राष्ट्रीय महामार्ग मध्ये धुळे जिल्ह्याला न्याय मिळावा, धुळे मध्यवर्ती शहरातील शासकीय हॉस्पिटल बंद पडले आहे, त्याकडे लक्ष द्यावे. नवीन शासन पूर्ण क्षमतेने काम करतंय, अनेक योजना गतीने राबवतय, धुळे जिल्हा शत प्रतिशत भाजपा झाला आहे.खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले, आ. अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर पॅटर्नचे काम मोठ्या प्रमाणात आदर्शवत केले असून वसंतराव दादा यांच्या पाण्याचा मंत्र भाईनी पुढे नेला. शिरपूरचा काया पायलट झाला. भाई यांच्या भाजप प्रवेशने भाजपाला चांगले दिवस आले. जिल्ह्यात सर्वत्र भाजपाची एकहाती सत्ता, मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लागावे ही अपेक्षा. सुलवाडे प्रकल्प मुळे शेकडो गावांचा प्रश्न मार्गी लागतोय, वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावा, खासदारांचे प्रश्न मार्गी लावा. भाई व आम्ही चांगले मित्र असून अशा नेतृत्वाचा आम्ही नेहमीच आदर करतो.प्रास्ताविक प्रभाकरराव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी करून आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!