प्रतिनिधी /विकी ओहोळ
दौंड – महाराष्ट्र सरकार यांनी परिपत्रक काढून फोनवर हॅलो न करता वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. हया असंविधानिक परिपत्रका विरोधात दौंड शहरात सर्व पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी दौंड पोलिस स्टेशन मध्ये व दौंड तहसीलदार यांना निवेदन देऊन हे परिपत्रक तातडीने मागे घेऊन रद्द करण्यात यावे अशी मागणी केली .तसेच मा.मुख्यमंत्री कार्यालय,व जिल्हाधिकारी यांना पॅथर जयदीप बगाडे यांनी ईमेल द्वारे निवेदन पाठवले होते. त्याचे उत्तर सुधा मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाले
दौंड पोलिस स्टेशन मध्ये निवेदन दिल्या नतंर येथील संविधान स्तंभा जवळ सर्व पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी मानवाधिकार व भ्रष्टाचार संघटना तालुका अध्यक्ष भारत सरोदे ,श्रीकांत शिंदे अध्यक्ष बौद्ध धम्म सेवा संघ दौंड व माजी नगरसेवक नागसेन धेंडे यांनी तिव्र स्वरूपात आपले विचार मांडले. व 5 ऑक्टोंबर रोजी सदर परिपत्रकाची होळी करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष जयदीप बगाडे, RPI जेष्ठ नेते पांडूरंग गायकवाड, RPI कार्यकर्ते विनोद भालसेन, प्रकाश सोनवने दौंड तालुका काँग्रेस पक्षाचे महासचिव, अजय गायकवाड दौंड तालुका सचिव पॅथर,साहेबराव पोळ अध्यक्ष सम्यक प्रज्ञा फाऊंडेशन, दिपक सोनवने अध्यक्ष संविधान स्तंभ समिती दौंड व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग तसेच निवेदनावर सही करणारे सर्वजण व दौंड शहरातील हया परिपत्रकाला विरोध करणारी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.