शिवतीर्थावर सभा झालीच पायजेल. बघा, शिवसेनेपेक्षा किती दुब्बल,तिब्बल,चौबल गर्दी जमवतो ते.माझं भाषण तर झक्कास होईल.फक्त विकास,विकास आणि विकास,दुसरं काहीच बोलणार नाही.आणि वघोषणांचा तर पाऊसच पाडतो,सर्व धरणं फुल्ल होतील. महा विकास आघाडीचे निर्णय बदलून धडाकेबाज सुरूवात करून भाजपा हायकमानची मनं आधीच जिंकली आहेत.हो,च्यायला ( sorry). अरे,वो कुमार किधर है, चल तूभी लगजा कामपे. गर्दी होनाच मंगता ना,मेलावा में.अबी तो अपनी युती है ना ? मेरे पास बोहत मटेरियल है. खोके,पेटी का हिसाब जाहिर करूंगा. दिघे साहेब के मर्डरका सिक्रेट बताके भूकंप भी करना है.मोदी साहेब और अमित शहा साब का कितना उपकार है,वो तो पहिलेईच बताउंगा. कारण बालासाहेब का शिवसैनिकको मुख्यमंत्री बनाने का सपना शहा साबने साकार किया.उनका उपकार कैसे भुल सकता हू़ं. अरे मै तो हिंन्दीमेच बोलता जा रहा हुं. वो दिल्लीके पत्रकार ने दम दिया था ना, दिल्लीमें पत्रकार परिषद लेना है तो हिंदीमेच बोलो,नही तो महाराष्ट्र मे जावो. मै तो भुलच गया के मै महाराष्ट्र का सीएम हुं.जाऊ द्या, माझ्या शिवसैनिकांनो,मी बाळासाहेबांची खरी शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला,पण हे लोक मला उगाच बंडखोर व गद्दार-गद्दार म्हणतात.तिकडे अजिबात लक्ष देऊ नका. ठाण्यात मी दहीहंडी लावली त्यावेळी फडणवीस, मोदी,शहांचे पोस्टर तर असेच गंमत म्हणून लावले होते,तेव्हढंच माझ्या श्रीकांत ला केंद्रात मंत्रीपद मिळणार असेल तर काय हरकत आहे, एक दिवस भाजपा नेत्यांचे पोस्टर लावायला. या शिल्लक शिवसेनेच्या नेत्यांत कधी मॅच्युरिटी येणार ? अहो, सोडली असती राष्ट्रवादी व काँग्रेस ची साथ तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहिले असते की नाही. हात उंच करून सांगा, राहिले असते की नाही ? मग आम्ही केले ते बरोबर की चुक ? बरोबरच आहे ना ? मग तुम्हीच सांगा आम्ही गद्दार की खुद्दार ?आत्ता शिवतीर्थावर दुसरा मेळावा आम्ही घ्यायचा नाही तर काय शिल्लक सेनेने घ्यायचा ? मी माझ्या माणसातर्फे निरोप पाठवला आहे, आमचीच शिवसेना खरी आहे, तुम्ही पण येऊ शकता की या मेळाव्यात, फक्त त्या भाजपाच्या अटी मान्य करा.नाही तरी आमच्याकडे वक्ते कुठे आहेत. काय ती झाडी,काय तो डोंगर,काय ते हॉटेल, सर्व ओक्के,हा डायलॉग जुना झाला. तसं मी गणपती च्या निमित्ताने वक्त्यांची जमवाजमव करीतच आहे, एकदा राज साहेब तयार झाले तर मग कोणाची गरज नाही. तसे ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, बावनकुळे आहेतच रिझर्व मध्ये.तर कट्टर शिवसैनिकांनो, मी तुमचाच आहे, बाळासाहेब व दिघे साहेब हेच माझेही दैवत आहेत, मग येताय ना माझ्या दुस-या मेळाव्याला. या गर्दी तर झालीच पाहिजे. नाहीतर माझा पचका होईल, आपले हिंदूत्व,बाळासाहेब व दिघे साहेबांवरील निष्ठा धोक्यात येईल. एकदा मेळावा सक्सेस झाला की, जाऊ गुवाहत्तीला,कामाख्या देवीचा नवस फोडायचा आहे. मग नक्की या आमच्या शिवसेना भाजपाच्या दुस-या मेळाव्याला !तुमचाच एकनिष्ठ, उठाव करणारा आणि हिंदूत्वाचा एकमेव रक्षक अर्थात एकच नाथ एकनाथ.
शब्दांकन
दिलीप मालवणकर
9822902470