संजय राऊत -गेले काही दिवस टिकेची सर्वत्र बरसात या एका नावावर होत आहे
ग़द्दारी केलेले आमदार, आणि शिवसेनेचे ‘हितचिंतक’ असलेले दृश्य अदृश्य भक्तगण राऊतांना टार्गेट करत व्हिलन बनवु पाहत आहेत.
आपण पैशासाठी किंवा ED किंवा अन्य तपासयंत्रनेला घाबरून ग़द्दारी केली हे मान्य केल तर लोक जोड्याने हाणतील म्हनून राऊत स्केप गोट बनवून वापरले जात आहेत.
हा हल्ला ठरवून आहे, कारणही तसच आहे. २०१९ नंतर मुख्यमंत्री सेनेचाच होईल म्हणत खिंड लढवनारे राऊतच होते. आता पाय लावून गेलेल्या पैकी एकही जण सेनेचा मुख्यमंत्री होईल किंवा व्हावा या बाबत अवाक्षर काढत नव्हता. भाजपचा तोंडचा घास अगदी तोंडातून ओढत तो सेनाप्रमुखाच्या पायाशी आणून त्यांनी ठेवला. शिंदेना तेव्हा मुख्यमंत्री व्हायच होत आणि तेव्हापासून शिंदे नाराज झाले, यात राऊतांनी संपूर्ण भाजप अंगावर घेतला त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काय? हे प्रमुख कारण आहे भाजपप्रेमीच राऊत नाव ऐकल्यावर पोटशूळ उठायच!
सत्ता स्थापन झाली तस भाजप या न त्या कारणाने ठाकरे सरकारला घेरत होत, मला अगदी एकदाही शिंदे किंवा त्यांचे एकनिष्ठ शिवसैनिक भाजपला अंगावर घेताना दिसले नाहीत.
भाजपने भिन्न लोक पाळलेत अर्नब नावाचा एक व्यक्ती उद्धव ठाकरेना आरेतुरे करत होता, कमरेख़ाली वार चालू होते तेव्हा शिंदे आणि ग़द्दार कंपनी मुग तोंडात धरून होते तेव्हा संपूर्ण मिडिया अंगावर घ्यायला राऊत उभे होते.
कंगना ताई ह्या लिस्ट मध्ये नाहीत अस होऊच शकत नाही, ताई ठाकरे खानदानावर बोलत होत्या, मात्र ठाकरेंवर अविरत प्रेम असनारी बांडगूळ गप्प होती. तेव्हा पण एकटा तोफ़खाना प्रमुख उभा होता.
सुशांतसिंह च आत्महत्या प्रकरण झाल, मिडिया आणि सोशल मीडिया मधुन आता थेट आदित्य ठाकरे हे नाव या प्रकरनात गोवल गेल, आधी हा खूनच आहे आणि त्यात आदित्यचा हात आहे असा आणि आदित्यने सुशांतसिंहच्या सेक्रेटरी सोबत दुष्कृत्य केलय किंवा त्याला याची माहिती आहे असा परस्पेकटिव तयार केला जात होता. थेट बाळ ठाकरेंच्या नातवावर आता हा वार होता, ज्यांची यांना फ़ार कणव असल्याचे हे ढोंग करतात त्यांच्या नातवाला यात हाकनाक गोवल जात होत तेव्हा या So called सच्चा सैनिक गँगच्या तोंडुन ब्र निघाला नाही! तेव्हा सुद्धा खिंड लढवायला एकच माणूस उभा होता. तो म्हणजे बाळ ठाकरेंचा संजय!
हे आता अड़ीच वर्षच नाही, राणे गेले, भुजबळ गेले, राज ठाकरे गेले त्याही प्रसंगी एकच माणूस सेनेची खिंड लढवत होता.
राऊतांना ठरवून टार्गेट केल जातय, बंडखोर पोपटपंची क़ेल्याप्रमाणे एकच नाव घेतायत, सोशल मीडियातून भाजपचे ट्रोल शिवसैनिक असल्याचा आव आणत राऊतांना खलनायक ठरवू पाहतायत,
बंडखोरांपैकी २०-२२ जण इतर पक्षाचे उंबरठे झिजवून सेनेत आलेत ते पक्षनिष्ठा शिकवतायत ते ही राऊतांना!
सत्ताबदल झाला आणि राऊतांना ED च समंस आल तरी हा माणूस आपली तलवार म्यान करत नाहीये.
राऊत दुधारी तलवार आहेत क्वचित एखादा घाव सेनेला त्रास देणारा होतो मात्र त्याचा हेतू शुद्ध असतो, सात्विक असतो आणि त्या तलवारीला निष्ठेची धार आहे, लोभसवाण रत्नजड़ीत म्यान पाहून तिच ईमान आजवर बदललेल नाही.
शिवसेना पर किया हर वार छातीपर लेता हूँ,
यूँ ही नही मैं, तोफखाना प्रमुख कहलाता हूँ…