वालचंदनगर पोलीस प्रशासनाची कामगिरी दमदार;पाण्यात अडकलेले नागरिक आणि तत्परता प्रशासनाची याचे अचूक उदाहरणं…
(निलेश गायकवाड)
गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे विविध ठिकाणी पाण्यामुळे विविध अडचणी तयार झाल्या. हे अडचणींना पाठीमागे टाकण्याचे काम वालचंद नगर पोलिसांनी केले आहे. म्हणजेच वालचंद नगर पोलिसांनी व ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
यामध्ये मौजे तावशी आणि सोनगाव यामधील बारामती इंदापूर रोडवरील पुलाजवळ एक व्यक्ती सोनगाव वरून तावशीकडे येत असताना पुलावर पाण्याच्या वेगाने तो वाहक चालला होता तेवढ्यात एक निलगिरीचे झाड आडवा आल्यामुळे त्या झाडाला तो जाऊन थांबला नागरिकांनी पोलिसांना फोन केल्याबरोबर पोलीस त्या ठिकाणी धावा धाव घेऊन तातडीने त्याला दोरांच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. यामध्ये त्यांचे नाव शिवाजी धोंडीबा जाधव वय ५७ हे एक प्रामुख्याने.
तसेच सणसर सांधाचाळ कळंब चिखली कुरवली उद्धट मंडलिक वस्ती तावशी येथील पाणी जास्त वाढल्याने येथील लोकांना तातडीने बाहेर काढणे करीता पोलीसांचे मोठे सहकार्य लाभले गावची वर्गणी करून त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली काही गावातील प्रतिष्ठीत नागरीक सणसरचे माझी सरपंच पार्थ निंबाळकर यांनी एक हजार लोकांना अन्नदान केले अशी परिस्थिती असताना पोलीसांनी ड्रेस खराब होईल याकडे लक्ष न देता जिवाची पर्वा न करता चिखलात जावून नागरीकांना घेवून दोन कामगारांचा जीव वाचविला व तावशी येथील एका व्यक्तीचा जीव वाचविला यामुळे वालचंदनगर पोलीसांची कामगिरी पाहून कौतुक नागरिकांनी देखील कौतुक केले.
यामध्ये प्रामुख्याने वालचंदनगर पोलीस स्टेशन चे
Api नागनाथ पाटील साहेब,
Psi रतिलाल चौधर साहेब,
Psi विजय टेळकीकर साहेब,
Pc अमोल चितकोटे साहेब आले होते.
ग्रामसूरक्षा दलातील महादेव भिकन लांडगे
सिंकदर मच्छिद्र गायकवाड
सोमनाथ संजय तुपे
सुनिल टिंगरे कुरवली
बबलू माने कुरवली आदिजन तसेच ग्रामस्थांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता.