अमळनेरच्या चहा विक्रेतेचा प्रामाणिकपणा! रस्त्यावर सापडलेलं पाकीट केलं परत..
अमळनेर : विक्की जाधव.
आजच्या काळातही काही लोकांमध्ये प्रामाणिकपणा टीकून आहे. याचा प्रत्येय अमळनेर मधील चहा विक्रेत्याच्या कृतीतून दिसून आलाय. रस्त्यावर पडलेलं पाकीट अमळनेरातील प्रांत कचेरी जवळील चहा विक्रेताच्या प्रामाणिकपणे मुळ पाकीट मालाकाल परत केलंय. माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण अमळनेर येथील संजय पाटील यांनी दाखवून दिलंय.
सविस्तर वृत्त असे की, दि .१६ रोजी अमळनेर येथील डीवायएसपी कार्यालयातील कर्मचारी पंकज सोनवणे यांचे पाकीट घरी जाताना खिशातून गहाळ झाले होते, त्यांनी गहाळ झाल्याबद्दल पोलीस नोंद केली होती, परंतु महत्त्वाचे कागदपत्रे त्या पाकीट मध्ये असल्यामुळे शोध मोहीम सुरूच होती.परंतु मिळून आले नव्हते.
प्रांत कचरी जवळील संजय टी कॉर्नर चे मालक आपल्या दैनंदिन काम करीत असताना बळीराजा स्मारक जवळील रस्त्याच्या कडेला पाकीट आढळून आले,त्यात महत्त्वाचे कागदपत्रे, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व रोक रक्कम आढळून आली होते, त्यांनी ते पॅकेट उचलून आजूबाजूस विचारपूस केले, परंतु तसं कोणी आढळून आले नाही, परंतु आधार कार्डवर ताडेपुरा पत्ता असल्याने त्यांनी पत्रकार प्रवीण बैसाणे यांच्याशी संपर्क करून मूळ मालकाशी संपर्क साधला, व प्रामाणिकपणे सर्व कागदपत्रासह मुद्देमाल पाकीट मालकास परत केले. तसेच पाकिट परत मिळाल्यानंतर पाकीट मालकाने चहा विक्रेताचे आभार मानले व प्रामाणिकपणा अजून जिवंत असून त्याचे मन भरून कौतुक केले.
सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही, असे बोलले जाते. महत्त्वाची कागद पत्रे व रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत दिल्याचे प्रसंगही दुर्मिळच. पण आजही माणुसकी, प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती संजय पाटील या चहा विक्रेत्याने त्याच्या कृत्यातून दिली आहे, म्हणून त्यांचे सर्वत्र प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.