मदनवाडी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात; अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास होत आहे विलंब
(निलेश गायकवाड)
पाटबंधारे विभागाच्या मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तलावात शंभर ते दीडशे एकराचे झालेल्या अतिक्रमणामुळे प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत आहे.
बारामती व इंदापूर येथे असलेल्या मौजे मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या तलावाचे क्षेत्र 170 हेक्टर असून या तलावावरती 100 हेक्टर शेती व पिण्याचे पाणी करता हा तलाव अवलंबून आहे. सदरचा तलाव 1972 साली बांधलेला असून अधिक त्यामध्ये 17 फुटून अधिक काळ साचलेला आहे. त्यातच तलावाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी तलाव क्षेत्रात मधील त्यांच्या जमिनीलगत तलावातील गाळ काढून वाढीव शेती म्हणजेच अतिक्रमण स्वरूप केले आहे. हे अतिक्रमण किमान 100 ते 150 एकरावर झालेली आहे. त्याचा गंभीर परिणाम तलावावरती पाणीसाठावरती झालेला आहे या अतिक्रमणामुळे तलावातील किमान तीन महिन्याचे पाणी कमी झालेले आहे. भविष्यती अतिक्रमण वाढून संपूर्ण तलाव लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
निंबोडी गावचे सरपंच संतोष सोनवणे यांनी या बद्दलची लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन देखील आणि कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांच्या आदेशाने देखील अतिक्रमण काढण्यास विलंब होत आहे.
सदरच्या अतिक्रमण हे दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याने मदनवाडी तलावावरती कुठेतरी मोठे संकट आले असल्याचे चित्र दिसत आहे. या तलावावरती हजारो कुटुंब शेतकरी आपला उदरनिर्वाह करत आहेत. मदनवाडी,निंबोडी,पिंपळे, स्वामी चिंचोली, भिगवण सदरची गावे यावर्ती अवलंबून आहेत.
– जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण न काढल्यास हायकोर्टात अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही रिट पिटीशन दाखल करणार आहोत अधिकारी शेतकऱ्याकडून आर्थिक व्यवहार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. जाणीवपूर्वक हा सर्व प्रकार सुरू आहे. तलावात अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहे. २०१७ पासून आम्ही पाठपुरावा करत असताना देखील अधिकाऱ्यांचं व अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचं लागे-बांधे चालू आहे.तरी मदनवाडी तलावातील अतिक्रमण न निघाल्यास अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
-संतोष सोनवणे.( सरपंच सिद्धेश्वर निंबोडी.