भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाचपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठ जळगाव जिल्हा पश्चिमच्या वतीने अमळनेर येथे एक भव्य कवि संमेलन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या दीप प्रज्वलन आणि अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या विशेष प्रसंगी खासदार स्मिता उदय वाघ, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक व कवि संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डी.डी. पाटील, बुद्धिजीवी प्रकोष्ठ जळगाव जिल्हा पश्चिम संयोजक प्रा. डॉ. जयंत पटवर्धन, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.प्रा. जयंत पटवर्धन यांनी अटलबिहारी वाचपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची व कवि व लेखक अटलजींच्या लेखनाबद्दल माहिती दिली.
खासदार स्मिता वाघ यांनी अटलजींच्या लेखनाचा त्यांच्या जीवनावर झालेला चांगला परिणाम आणि जनसंघापासून भाजपपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची माहिती दिली. यावेळी अटलजींचा सहवास लाभलेल्या अमळनेरमधील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते सुभाष चौधरी, प्रा. मनोहर बडगुजर, नरेंद्र निकुंभ यांचा सन्मान करण्यात आला, ज्या वेळी त्यांनी अटलजींच्या अनेक आठवणी उपस्थितांशी शेअर केल्या.
त्यानंतर उपस्थित सर्व कवींना सन्मानित करण्यात आले. कवींनी त्यांच्या काव्य सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या वेळी भाजपा अध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, शितल देशमुख, दिलीप ठाकूर, मनोहर सोनवणे, दत्ता नाईक, दिनेश पालवे, अनिल लाड, सुभाष पाटील, शेखर कुलकर्णी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. रमेशजी माने यांनी केले, तर आभार प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी मानले.