June 29, 2025 3:08 am

अमळनेर: पाण्याची गंभीर परिस्थिती नागरिकांची चिंता वाढवत आहे..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर: पाण्याची गंभीर परिस्थिती नागरिकांची चिंता वाढवत आहे..

 

अमळनेर: विक्की जाधव..

अमळनेर नगरपरिषद वसुलीमध्ये क्रमांक एकावर असताना, नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यात मोठा अडथळा ल्याचे दिसून येत आहे.

“नळपट्टी आणि घरपट्टी भरा, अन गडूळ पाणी प्या,” अशी स्थिती नागरिकांना भेडसावत आहे. 

अमळनेर नगरपरिषद हद्दीत बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याची प्रारंभिक अवस्था असूनही, पाणीपुरवठा अनियमितपणे होत असल्यामुळे अमळनेरकरांमध्ये नाराजीची भावना आहे. 

अनेक ठिकाणी आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही, आणि पालिकेला आपल्या समस्या विचारणार्‍या नागरिकांचे लक्षात घेतले जात नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. “आमंची समस्या कोण ऐकणार?” असा प्रश्न विचारणारे नागरिक दिसत आहेत.

उपलब्ध पाण्यातील गढूळपणा देखील नागरिकांचे जीवन अधिक कठीण करत आहे. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी देखील नळातून गडूळ पाणी येत असल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष द्यावे आणि नागरिकांचे आरोग्य व सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे. अमळनेरकरांनी पाण्याच्या समस्येवर आवाज उठवण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निवारण होईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!