टक्केवारीच्या निष्कृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातील जनतेला सहानुभूती नाहीच..
अमळगाव दलित वस्तीच्या 25/15 च्या निष्कृष्ट दर्जाच्या कमानीचा, काम सुरू असतानाच कोसळला होता स्लॅब, अमळनेर ची जनता सुज्ञ आहे.
अमळनेर : विक्की जाधव
अमळगाव येथे राजवाड्यालगत शेतात उभारण्यात आलेले प्रवेशद्वार कोसळले. त्यानंतर पुढे काय झाले याचा पत्ता आजही नाही. आज या दरवाज्याचे अवशेषही शिल्लक नाहीत. मग या परिसरात झालेल्या कामांवरील निधी मुरला कुठे? असा प्रश्न ग्रामीण नागरिकांना पडला आहे.
अमळनेर शहरात शुद्ध आणि रुचकर खावय्या ग्राहकांसाठी फॅमिली ची उत्तम व्यवस्था फक्त कोमल भोजनालयात.
टक्केवारीतून होणारे कामांची सामान्य जनता आता चौकशी करून हिशोब मागू लागली आहे. ज्या अमळगाव गटाने राजकारणात तुमचा श्रीगणेशा करून दिला त्या गटाला मंत्री महोदय तुम्ही तोंडाला पाने पुसली तर ह्या निवडणुकीत तुमचे पुनर्वसन होणार का?? नक्कीचं नाही. गावाने नाकारलेल्या लोकनियुक्त भ्रष्टाचाऱ्यासह चांडाळ चौकडीला तुम्ही सोबत मिरवत असून हे दृश्य पाहूनच लोक आपसूचक तोंडे फिरवत आहेत.
दुष्काळाच्या अस्मानी संकटाशी येथील शेतकरी झुंजत असताना तुम्ही त्यांच्यावर सुल्तानी संकट लादले. पिक विमासाठी तरसावले. तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले. त्यामुळे शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकाचा तळतळाट होत असून रॅलीत काय भाषणालाही कोणी उभे राहुन तुमच्या चाटा ऐकायला तयार नाही. आता जनतेचा अपेक्षाभंग आणि भ्रमनिराश झालेला असून फाटका असला तरी चालेल पण तोंडाचा सुटलेला नको अशी मानसिकता अमळनेर मतदारसंघवासीयांची झालेली आहे.
क्रमश :