दोन तालुक्यातील शेतकऱ्याचा कैवारी कृषिभूषण साहेबराव पाटील, अमळनेर व पारोळा तालुक्यात खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करा..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर व पारोळा तालुक्यात खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्या. अशी मागणी शेतकऱ्यांचे कैवारी मा. आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि शसनाकडे केली आहे.
खरीप हंगाम – जून ते सप्टेंबर, २०२४ आणि १३ ऑक्टोबर, २०२४ अखेर अमळनेर तालुक्यात ९८४.२६ मि.ली. आणि पारोळा तालुक्यात ७५७.०० मि.ली. म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक सततचा पाऊस, विजांचा कडकडाटसह वादळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम – २०२४हातातून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होवून दुहेरी संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची शासनाप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्या.असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना अजितदादा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील,कृषी मंत्री ना धनंजय मुंढे ,मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील आदींना देण्यात आलेले आहे.
यावेळी कृषिभूषण यांच्या प्रतिनिधी ने मार्मिकशी बोलतांना सांगितले कीं..
शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून जनतेची शासनाप्रती असंतुषाची भावना निर्माण झाली असून शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करून तातडीने मदत करावी. सामान्यांना कुटुंबातील शेतकऱ्यांचे शासनाने हाल बघू नये असे हीं तें म्हटले.