माजी आमदार शिरीष चौधरी यांनी स्पष्ट केली आपली भूमिका. तर जनता आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहस्थव अपक्ष लढावणार विधानसभा
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात काल माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. शिरीष चौधरी उभे राहतात की नाही अशी चर्चा आजी-माजी आमदार जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटे अफवा पसरवून अनेक दिवसांपासून तालुक्यात घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करत आहेत. परंतु माझी आमदारकी अपक्ष असून मी विधानसभा लढवणारचं या निर्णयावर माजी आमदार शिरीष चौधरी आणि मित्र परिवार ठाम आहे.
मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांचे साठे लोटे झाल्याने.
माजी आमदार शिरीष चौधरी हें एकाच विरोधक सद्या उरले आहेत अशी त्याची भीती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेत काय काय खेडी होतात हे येणाऱ्या काळात दिसेलचं पण शिरीष दादा चौधरी निवडणूक लढतील हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले कीं अमळनेर मतदार संघ काही नेत्यांच्या बोटावर नाचणारा असे दर्शविले जात आहे. पैशांवर तालुका विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांना जनता आपली जागा नक्कीच दाखवेल. ही मग्रुरी थांबली पाहिजे. काही मोठे नेते अपघाताने निवडून आले, तो अपघातच होता. त्यांचे कार्यकर्ते अफवा पसरवत आहेत की शिरीष चौधरी आमदारकी लढवणार नाहीत. तें त्यांचे त्यांचे तर्क लावत आहेत. मी आतच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावा घेतला, पाच वर्षांपासून जनतेच्या संपर्कात आहे. आताही माझे कामे सुरू आहेचं
32 गावांना पिक विमा संदर्भात..
जनतेची दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांना शेतकरी दाखवणार त्यांची जागा तालुक्यातील मारवाड गटातील 32 गावांना पिक विमा संदर्भात अडकलेले पैसे श्री शिरीष दादा चौधरी यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मिळून दिले. असुन माननीय मंत्री साहेब अनिल भाईदास पाटील या संदर्भातही राजकारण करत आहे.
या संदर्भात श्री शिरीष चौधरी यांनी बोलताना असे सांगितले की तालुक्यातील 32 गावांच्या शेतकऱ्यांनी मंत्री महोदय अनिल भाईदास पाटील यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला होता.
त्यावेळी शेतकरी बांधवांना मंत्री महोदय अनिल भाईदास पाटील यांनी रिकाम्या हाती परत पाठवले होते.
हे तालुक्यातील शेतकरी बांधव विसरणार नाहीत.
तर त्यांनी तालुक्यात विविध ठिकाणी यां संदर्भात बैनर लावले होते तें शेतकऱ्यांनी फाडून लावले होते.