पैशाच्या वादातून जळोद येथे एकास माराहाण
अमळनेर :विक्की जाधव
उसनवारीच्या पैशातून एकाला मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील जळोद येथे घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलली माहिती अशी की, जळोद येथील बँड मास्तर गौतम समरथ शिरसाठ यांनी हिंगोने सिम येथील शालीक देविदास कोळी यांच्याकडून उसनवारीने ५० हजार रुपये घेतले होते. नंतर ते त्यांनी परत दिलेले असताना
देखील २४ रोजी शालीक कोळी हे शिरसाठ यांच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी करत होते. पैसे परत केले आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने कोळी यांनी शिरसाठ यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली
या संदर्भात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.