मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला दिला नवा अल्टीमेटम
जालना : (विशेष प्रतिनिधी – वर्षा चव्हाण )
मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणावर बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे.
राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी जरांगेची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली आहे.
अशातच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला असून आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमक्या काय? :
▪️ मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या.
▪️ ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे त्याच्या सोयऱ्यांनाही सरसरकट कुणबी प्रमाणपत्रक द्या.
▪️ ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्रक लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्रक द्या.
▪️ कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी 100 टक्के शिक्षण मोफत करा.
▪️ मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
▪️ मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
▪️आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
▪️ SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
▪️ वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.