June 29, 2025 8:18 am

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे करमाळा शहरात कृत्रिम पाणीटंचाई?

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी – सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व उजनी धरण मायनस मध्ये गेल्याने शहरात व जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.तथापि करमाळा शहरांमध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.
काल दुपारी दोन ते अडीच वाजले पासून दहीगाव पंपिंग स्टेशन येथील पंपामध्ये कचरा अथवा काहीतरी अडकल्यामुळे कमी दाबाने पाणी येत आहे. सदरची बाब कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देऊन ही अद्याप पर्यंत पंपामध्ये अडकलेले काढले नसल्यामुळे केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे करमाळा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे त्यामुळे शहरास दोन किंवा तीन दिवसात पाणीपुरवठा होत आहे . तरी सदरची दुरुस्ती तातडीने करून शहरास होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच
सदर घटनेची वरिष्ठांनी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!