इतके दिवस जनतेला फाट्यावर मारलं आता, फाट्यापाट्याने जनतेच्या मागे पळताना दिसत आहेत
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील जनतेचे आता सोन्याचे दिवस आले आहेत. असेच म्हणायची वेळ आली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कधी न ही ढुंकून बघणारे नेते पायाला भिंगरी लावून . जनतेच्या मागे पुढे करताना दिसत आहेत.गेली पाच वर्ष यांच्या फक्त फोटोसेशन कारभारामुळे जनता हैराण झाली होती.
जनता आता येणाऱ्या काळात देखील त्यांच्या कारभारावरती भाकरी नक्की फिरवणार एवढे चित्र इंदापूर तालुक्यात निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांनी कितीही ओरडून सांगितले आपल्याच नेत्याची लाल तरी देखील जनता मात्र त्यांना फाट्याने फाट्याने मारल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र निर्माण झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील जनतेने येणाऱ्या काळात देखील काही गोष्टी नेत्यांकडून अनपेक्षित घडतील त्याचे नवल वाटून घेऊ नये. कारण सध्या येणाऱ्या काळात निवडणुकीचे चित्र असल्याने फाट्याफाट्याने मारणारे नेते आता तुमच्या मागे फटाफटाने फिरताना दिसणार … त्यामुळे इंदापूरकरांनो सावधान