पत्रकार हितेंद्र बडगुजर व त्यांच्या बंधूनी दाखविला
प्रामाणिकपणा..
१५ हजार किमतीच्या सापडलेला मोबाईल केला परत..
अमळनेर : विक्की जाधव..
या बाबत अधिक माहिती अशी कीं अमळनेर येथे वैयक्तिक कामानिमित्त आलेले बोरकुंड ता. जि. धुळे येथील रहिवाशी दगडू माळी हे आपले काम आटपून बोरकुंड कडे जात असताना मंगरूळ एमआयडीसी जवळ त्यांच्या खालच्या खिशातून मोबाईल पडला परंतु ते मोटरसायकलने जात होते म्हणून त्यांच्या लक्षात आले नाही.
त्यानंतर काही वेळाने अमळनेर येथील पत्रकार हितेंद्र बडगुजर यांचे बंधू गाडी चालक महेंद्र बडगुजर हे अमळनेर हुन् धुळे रस्त्यावर रणाईचे येथे त्यांच्या मालवाऊ गाडीत माल भरून जात असताना रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान मंगरूळ एमआयडीसी ग्यानी ढाब्या जवळ रस्त्यावर मोबाईल पडलेला दिसला त्यावेळी महेंद्र बडगुजर यांनी तो मोबाईल उचलून पत्रकार हितेंद्र बडगुजर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी लागलीच अमळनेर पोलीस स्टेशन येथील गोपनीय शाखेचे श्री. डॉक्टर शरद पाटील यांना कळवले त्यांनी मूळ मालकाच्या शोध घेऊन दुसऱ्या दिवशी अमळनेर येथे बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे साहेब यांच्या हस्ते मूळ मालकास मोबाईल परत केला त्याच्या या कृतीने प्रामाणिकपणा आजही शिल्लक असल्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळाले. यावेळी पीएसआय भुसारे साहेब पीएसआय अक्षदा इंगळे मॅडम गोपनीय शाखेचे डॉक्टर शरद पाटील पत्रकार हितेंद्र बडगुजर उपस्थित होते.
अमळनेर शहरात ही घटना घडली आहे.
मनात कुठलाही मोह न बाळगता मालवाहू छोटा हत्ती चालक महेंद्र बडगुजर यांना सापडलेला तब्बल १५ हजार रुपये किमतीच्या मोबाईल फोन निरपेक्ष भावनेने दोंदवाडे बोरकुंड जिल्हा धुळे येथील दगडू माळी यांना परत केला आहे.
सोने, पैसा, संपत्ती यांचे आकर्षणा पायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात
छोटा हत्ती मालवाऊ गाडी चालक महेंद्र बडगुजर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी संबंधित दगडू माळी( मोबाईल मालक) यांनी गाडी चालक महेंद्र बडगुजर व अमळनेर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे साहेब, गोपनीय शाखेचे डॉक्टर श्री शरद पाटील व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानलेत.
जग कितीही बदलले तरी
प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा
आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव अमळनेर शहरात बघायला मिळाला.
यावेळी पत्रकार हितेंद्र बडगुजर बोलले की आई-वडिलांनी
पहिल्यापासून आम्हा भावंडांवर अतिशय चांगले संस्कार व प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सोने, नाणे, पैसा मोबाईल यापेक्षाही नीतिमत्ता व प्रामाणिकपणा हा खूप किमती असून याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही. कष्टाचा रुपया आपल्या सत्कारणी लागेल परंतु हरामाचा आपल्याला कधीच पुरणार
नाही. त्यामुळे कष्टाच्याच पैशाला व कष्टाने घेतलेल्या वस्तूला आमच्या कुटुंबात स्थान असल्याची भावना पत्रकार हितेंद्र बडगुजर यांनी व्यक्त केली.