हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनजयभाई देसाई ह्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून दिनांक 1 ऑगस्ट 2023 ह्या दिवशी अटक करण्यात आलेली आहे. त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जो कट रचण्यात आला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. ह्या गुन्ह्यातील फिर्यादी बलकवडे नामक व्यक्ती 302 गुन्ह्यातील आरोपी आहे. खुनाचे आरोप असलेला हा व्यक्ती शेतकर्यांना त्रास झाल्याचे तसेच शेतकर्यांवर अन्याय झाल्याचे खोटे कट-कारस्थान झाल्याचे सांगून देव, देश आणि धर्म कार्यासाठी अहोरात्र झटणारे धनंजय भाई देसाई ह्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याचा बोलविता धनी कोण आहे याचाही तपास झाला पाहिजे.
मुळात ओम साई इंटरप्रायझेस ह्या नावाने बलकावडेचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. अनेक जमिनीवर ताबा मारून जमिनीच्या व्यवहारात कमिशन घेऊन स्वतःची उपजीविका चालवणारी हि व्यक्ती जिचे साधे सात बारावर नाव नाही ती व्यक्ती स्वतःला शेतकरी कसे काय म्हणू शकतो? शेतकरी असल्याच्या नावाखाली जमिनीच्या उलाढाली करून खोट्या केसेस करून सहानुभूतू मिळवण्याचा हा प्रकार अतिशय चुकीचा आहे.
प्रदीप बलकवडे ह्या व्यक्तीवर 302 अन्वये खुनाचा तसेच तो करीत असलेल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा प्रशासनाने खोलवर तपास करावा हि विनंती. त्याने हिंदुराष्ट्र सेना प्रमुख श्री. धनंजयभाई देसाईंवर केलेल्या खोट्या केसचा प्रशासनाने तपास करून ह्या षड्यंत्रात सहभागी असणार्या सर्वच संबंधितांवर कडक कारवाई करावी व धनजयभाईंना सन्मानाने मुक्त करून जनमानसाचा आदर राखावा.
श्री धनंजयभाई देसाई हे राष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत.. धनंजयभाईनी देव, देश आणि धर्म कार्यासाठी भारतमातेच्या रक्षणासाठी देशात युवकांची मोठी शक्ती निर्माण केली आहे. हिंदुराष्ट्र सेनेने देशभरात राष्ट्रभक्तीचे कार्य केले आहे व करत आहे परंतु सध्या श्री. धनंजयभाई देसाई यांना षडयंत्र करून अटक करवली आहे. तरी त्यांना न्याय मिळावा म्हणून सकल हिंदू समाज प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे. च्या वतीने त्यांच्या सन्माननीय सुटकेची.यावेळी वावडया पाटील,सागर रामराव पाटील, सुरज भिल, दिनेश कोळी, दिनेश मालचे, योगेश ढोले, नितीन कोळी,अर्जुन राजपूत,नक्षत्र पाटील,राजा कोळी,तुषार बारी, विजय पवार, सागर पाटील, देविदास भिल, किरण कोळी,अविनाश भिल आदी उपस्थित होते.