म्हसोबावाडीची विहीर दुर्घटना दुर्दैवी – हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे दि.2/8/23
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंगचा भाग विहिरीत कोसळून त्यामध्ये 4 कामगार अडकण्याची घटना ही दुर्दैवी असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या दुर्घटने संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांशी रात्री संपर्क करून सर्वतोपरी मदतकार्य करणे संदर्भात चर्चा केली.
या दुर्घटनेची माहिती अँड.शरद जामदार यांचेकडून काल मंगळवारी रात्री 9:30 वा. हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयास समजताच तेथून तातडीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांशी दुर्घटने संदर्भात संपर्क करण्यात आला. अँड. जामदार व कार्यकर्ते रात्रीपासून दुर्घटना स्थळी आहेत. दुर्घटनाग्रस्त विहिरीमध्ये रिंगसह मुरमाचा ढीगारा कोसळल्याने त्यामध्ये सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण हे चार बेलवाडी (ता. इंदापूर) गावचे कामगार अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन यंत्रणेचा भाग असलेले एनडीआरएफचे जवान या ठिकाणी मदत कार्य करीत आहेत. या दुर्घटने संदर्भात आवश्यक मदतीसाठी हर्षवर्धन पाटील हे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क ठेऊन आहेत.