शिरपूर: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ३ भारत सरकार यांचे धोरणा नुसार काही अटी व शर्थीच्या अधिन राहून आपल्या कंपनीला या महामार्गाची देखभात आणि त्यावर टोल कर वसुलीसाठी परवानगी दिली गेली असून त्याप्रकारे शासनाने आपल्या कंपनी बरोबर करार केला आहे. परंतु कंपनीचा शासनाबरोबर झालेल्या कराराचे व राज्य शासनाने घालून दिलेल्या खालील नियमांचे उल्लंघन कंपनीकडून होत आहे. वाहन धारक, आणि स्थानिक नागरिक यांच्या अनेक तक्रारी पक्ष संघटनेकडे प्राप्त झाल्या आहे त्या संदर्भात आपल्या कंपनीकडे मागणी करत आहोत.
१] सुस्थितीत खड्डेमुक्ती रस्ते – रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजविल्या शिवाय टोल वसुली करू नये. २] रुग्णवाहिकेच्या २४ तास मोफत सुविधा अपघात ग्रस्त वाहन धारक आणि प्रवासी यांना हॉस्पिटल पर्यंत मोफत सुविधा देणे. ३) नादुरुस्ती वाहन आणि अपघातग्रस्त वाहनांना टोइंग सेवा मोफत देणे. ४] पिवळ्या रंगाची (पट्टी) लाईन १०० मीटर पेक्षा जास्त लांब गाडयांची रांग असायला नको च्या पेक्षा जास्त असेल तर ते वाहन मोफत सोडलेच पाहिजे, ५] सर्विस रोड वरिल समातर पर्यायी मार्गावरील टोल बंद करावे. ६] स्थानिक रहिवाशी असलेल्या वाहन धारकांना प्राधान्याने सवलत देण्यात यावी. ७] १० सेकंदा पेक्षा जास्त वेळ स्कॅन साठी लागल्यास किंवा फास्टंग मध्ये पैसे जमा किंवा शिल्लक आहे पण स्कॅन होत नसेल ही चुक टोल यंत्रणा किंवा टोल प्लाझाची असून ती जबाबदारी कंपनीची आहे. से वाहन तत्काळ मोफत सोडावे ८] महिला / पुरुषांसाठी मोफत स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करणे. ९] वाहनांना मोफत वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था करणे. १०] महिलांसाठी लहान मुलांना स्तनपान गृहाची व्यवस्था करणे. ११] प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करणे. १२] जनतेला देण्यात येणाऱ्या सुविधांचे फलक वाहन धारकांना दिसेल असे मोठ्या अक्षरात प्रत्येक मार्गिकेत लावावे.
टोल नाक्यावर काम करणारे कर्मचारी व कामगार नियमावली
१. कंपनीच्या मान्यप्राप्त गणवेश व ओळखपत्र. २. स्थानिक पोलिस ठाणे यांचा चारित्र्य पडताळणीचा दाखला. ३. प्रशिक्षित कामगारांनाच प्राधान्य देणे. ४. स्थानिक कामगारांना प्राधान्य. ५. कामगारांच्या व्यतिरिक्त, गुंड, बाउन्सर यांची नियुक्तीस बंदी घालणे. ६. वाहन चालकांबरोबर आदरयुक्त, सन्मानपूर्वक आणि विनम्रपणे सवांद साधने.
वरील मागण्यांची नियमांची अंमलबजवणी १५ दिवसांच्याआत करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची संपूर्ण जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंपनीची असेल. या वेळी संजय पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष, नक्षत्र पाटील जिल्हा संघटक, छोटू राजपूत जिल्हा संघटक, राहुल शिराळे जिल्हा उपाध्यक्ष, पुनमचंद मोरे तालुकाध्यक्ष, सोनू राजपूत विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष, पंकज मराठे शहराध्यक्ष, विकी पाटील शहर उपाध्यक्ष, गौरव पाटील तालुकाध्यक्ष वाहतूक सेना, अतुल सोनार शहराध्यक्ष वाहतूक सेना, शुभम गवळी शहर उपाध्यक्ष वाहतूक सेना, राहुल पाटील तालुका उपाध्यक्ष वाहतूक सेना, हिमांशू सूर्यवंशी, मयुर इशी रुपेश गवळी, धनंजय पाटील, चेतन पाटील, दर्शन पाटील, भाग्येश भावसार, नरेश ठाकरे आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.