आज आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा वर्धापन दिन
गद्दारांनी खंजीर वाटप करून त्यांचा
वर्धापन दिन उद्या साजरा करावा !
आज आपल्या शिवसेनेचा वाढ दिवस आहे. १९६६ साली मा. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना संघटना हिच खरी शिवसेना. इतर गद्दारांनी कितीही ऊर बडवून माझीच खरी शिवसेना असा आकांत केला किंवा बांग दिली तरी सर्वसामान्य जनताच काय भारताचा शत्रू राष्ट्र देखील मान्य करतो की बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना.
गद्दारांनी खंजीर खुपसून व निवडणुक आयोगाशी संगनमत करून मिळवलेली शिवसेना ही खरी शिवसेना असूच शकत नाही. गद्दारनाथ एकनाथ शिंदे यांचा जन्म १९६४ सालचा व शिवसेना स्थापन झाली १९ जून १९६६ साली. त्यावेळी एकनाथ शिंदेंना स्वत:च्या चड्डीची नाडी बांधता येत नव्हती की गळणारे नाक पुसता येत नव्हते. एकनाथ शिंदे हे १९८५ च्या आसपास किसननगर शाखेचे शाखा प्रमुख होते. दिघे साहेबांच्या दरबारातील एक सांगकामे इतकीच त्यांची ओळख १९९७ पर्यंत होती. १९९७ साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यामुळे १९६६ ते १९९६ अशी ३० वर्षे एकनाथ शिंदे हे नगण्यच होते. त्यामुळे त्यांनी माझीच खरी शिवसेना म्हणणे हास्यास्पद आहे.१९९७ ते २००१ असा ४ ते ५ वर्षाचा ख-या अर्थाने त्यांना दिघे साहेबांचा सहवास लाभला. यावरून ते स्वत:ला दिघे साहेबांचे पट्टशिष्य म्हणवत आहेत.मी तर १९७४ पासून दिघे साहेबांचा सहवासात राहिलो.परंतू मी कधीही स्वत:ला पट्टशिष्य म्हणवून घेतले नाही.
वरील सविस्तर माहिती याचसाठी दिली आहे की, एकनाथ शिंदे यांचा माझीच खरी शिवसेना हा दावा किती खोटा आहे.जी व्यक्ती आपल्या गद्दारीचा अभिमान बाळगते व त्याची चर्चा ३१ देशांत झाली अशी दर्पोक्ती करते त्यांना गद्दारी ही खुद्दारी वाटते, बंडखोरी हा उठाव वाटतो, आपल्यापेक्षा १ वर्षाने लहान शहा पित्यासमान वाटतो, जो आनंद आश्रमवरील आनंद दिघे ही अक्षरं मिटवून दिघे साहेबांना मी आदर्श मानतो,हे ढोंंगीपणाने सांगत सुटतो, जो बाळासाहेबांना आदर्श मानण्याच्या वल्गना करतो परंतू त्यांच्या पुत्राच्या पाठीत खंजीर खुपसतो, मुलाच्या वयाच्या आदित्यला संपवण्याच्या गोष्टी करतो, ती व्यक्ती शिवसैनिकही असू शकत नाही मग त्यांची शिवसेना असणे कसे शक्य आहे ?
आजचा वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिकांच्या शिवसेनेचा आहे, ज्यांच्यात त्याग, समर्पण व निष्ठा ठासून भरलेली आहे, अशा शिवसैनिकांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. गद्दारांना फक्त ओरबाडणे ठाऊक आहे, निष्ठेचा अर्थच ज्यांना ठाऊक नाही, मिंधेगिरी ज्यांच्या रक्तात भिनली आहे,महाराष्ट्रात राहून जे दिल्लीच्या मोदी शहांच्या इशा-यावर नाचणारे बोलके बाहुले बनले आहेत, शिवसेनेच्या शत्रूशी संगनमत करणारे व नामधारी मुख्यमंत्री पद मिळवण्यात धन्यता मानणा-यांना, आमच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणजे नाही.
त्यांनी उद्या आपला गद्दार दिन नक्की साजरा करावा, त्यांनी खंजीर वाटप करावे. हा त्यांचा पहिला व शेवटचा वर्धापन दिन आहे, हे सत्य मात्र नाकारू नये.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक
९८२२९०२४७०