वृक्षमित्र श्री भुषण आसांबर चौधरी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
समाज उपयोगी हरित क्रांती केल्यामुळे, व जे निसर्गाकडून कमावले तेच निसर्गाला परत केले पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे धुळे शहरातील रक्तकर्ण म्हणून प्रसिद्ध असलेले व सामाजिक कार्यकर्ते श्री भुषण आसांबर चौधरी यांना धुळे शहराचे महापौर यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात.
शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध अन्न, नैसर्गिक वनस्पती इत्यादी आपण पर्यावरणातून मिळवतो. याउलट, आजकाल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लालसेपोटी जंगलांचे शोषण करत आहेत,-झाडे तोडत आहेत आणि भौतिक सुखातून मिळालेल्या नैसर्गिक संसाधनांचे शोषण करून प्रदूषण वाढवत आहेत, या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर होत आहे . पृथ्वी , जमीन , जर सुंदर , उत्कृष्ट हवी असेल तर त्या साठी जास्तीत जास्त लोकांनी वृक्ष लागवड करावी असे मत महापौर यांनी व्यक्त केले.