करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- श्री.संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन दिनांक २१ जुन ला रावगाव येथे होणार असुन त्यापुढचा प्रवास हा करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील सुमंथनगर,जुना हाॅटेल दुर्गा पॅलेस,कुंभारवाडा पुल,संभाजीनगर, किल्ला वेस मार्गे शहरात जाणार असुन तत्पुर्वी या मार्गावरील करमाळा नगरपरिषदेने साफसफाई स्वच्छता करावी याबाबत चे निवेदन मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवीका बानु फारुक जमादार यांनी दिले आहे
जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,श्री,संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी प्रभाग क्रमांक एक मधुन दरवर्षी याच मार्गाने येत असते परंतु या मार्गात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी वेड्या बाभाळी चे झाडी आलेले आहे तर कुंभारवाडा पुलाच्या दोन्ही बाजुस धोकादायक खड्डा आहे तसेच संभाजीनगर बारवविहीर समोरील रस्ता खराब झालेला आहे रस्त्यावर लहान लहान दगडे पडलेली आहे घाण प्रचंड प्रमाणात झालेली असुन मुख्याधिकारी यांना वारंवार सांगुन दुर्लक्ष करत आहे तरी पालखी येण्यापुर्वी सदरचा रस्ता व साफसफाई स्वच्छता करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल,जिल्हाधिकारी सोलापुर आमदार संजय मामा शिंदे तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले आहे