एसबीसी 3, जिल्हा प्रशासन नेहरू युवा केंद्र संघटन यांच्यामार्फत नुकतच बोराडी गावानंतर बेटावद या गावात बालविवाह प्रतिबंध या विषयावर भव्य पथनाट्य करून जनजागृती करण्यात आले. या कार्यक्रमात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. बालविवाह कशा पद्धतीने गंभीर विषय समाजामध्ये आहे पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी सादर केले. यावेळेस युनिसेफ जिल्हा समन्वयक नंदू जाधव सर आणि नेहरू युवा केंद्र संघटन जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेजवाल सर यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम पार पडला. यावेळेस योगाचार्य जितेंद्र जी महाराज, सामाजिक कार्यकर्ते अज्जू भाऊ जाधव, दिनेश बंजारा, जितेंद्र राठोड, सचिन जाधव, मुकेश जाधव, रोहित जाधव, लखन जाधव, गोपाल जाधव, ऋतिक जाधव, नारायण जाधव, राहुल राठोड, विश्राम जाधव आदी युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळेस मोठ्या प्रमाणात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी समाधान व्यक्त केला.