June 29, 2025 4:05 pm

रेल्वेमंत्री ना रावसाहेब दानवे यांचाकडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी नरडाणा रेल्वे स्टेशन येथे मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : रेल्वेमंत्री ना रावसाहेब पाटील दानवे यांचाकडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी नरडाणा रेल्वे स्टेशन येथे विविध मेल – एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. निवेदन (दि.१५ सप्टेंबर) रोजी ई मेलने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी पाठवलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या २५ वर्षापासुन परिसरातील व धुळे जिल्ह्यातील नागरीकांची नरडाणा रेल्वे स्टेशनवर मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी अहे. त्या खालील प्रमाणे : बोराणी एक्सप्रेस (१९४८४/१९४८३), प्रेरणा एक्सप्रेस (२२१३७/२२१३८), पुरी अहमदाबाद- एक्सप्रेस (२०८६१/२०८६२), हिसार एक्सप्रेस (२२७३७/२२७३८), हावडा एक्सप्रेस, ताप्तीगंगा सुरत – पटना एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस या गाड्यांना नरडाणा येथे थांबा मिळावा तसेच खान्देशच्या जनतेसाठी मुंबईला जाण्यासाठी पश्चिम मार्गावरील महत्वाची गाडी असलेली खान्देश एक्सप्रेस हि गाडी आडवड्यातुन तीन दिवस धावते या गाडीला मिळालेला प्रतिसाद पाहता तिला दररोज करुन तिच्या वेळेत ही बदल करण्यात यावा हि गाडी भुसावळहुन सायंकाळी ५ ऐवजी ७ वाजेला तर बांद्रा येथुन रात्री १२ ऐवजी १० वाजेला सुटली पाहिजे. तसेत सुरत-भुसावळ (प.रे.) (वरील रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण करण्यात आले आहे. येथून जवळपास २० हून अधिक मेल-एक्सप्रेसवे जातात. या रेल्वे गाड्यांना नरडाणा स्टेशनवर थांबा नसल्यामुळे १,२२००० प्रवाश्यांना लाभ न मिळाल्याने परिसरातील प्रवाश्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवाय मनमाड इंदौर रेल्वे मार्गाचे काम हि लवकरात लवकर करण्यात यावे. त्यामुळे येथे मनमाड-धुळे-इन्दौर रेल्वे मार्गाचे जंक्शन स्टेशन होणार आहे. तरी देखील आज पर्यंत कोणत्याही मेल-एक्सप्रेस रेल्वेला येथे थांबा नसल्यामुळे बरेचसे प्रवासी इतर रेल्वे स्टेशनवर जाण्याचा मार्ग अवलंबतात. रेल्वे प्रशासनाद्वारे वरील विषयी प्रवाश्यांना योग्य तो न्याय मिळेल आणि वरील सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना नरडाणा (प. रेल्वे) स्टेशनवर त्वरीत थांबा मिळावा यासाठी आपण आपल्या स्तरावर न्याय मिळवून द्यावा अशी मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी रेल्वेमंत्री ना. अश्विनी कुमार, रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांना पाठवलेल्या निवेदनातुन वरील मागणी केलेली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!