राज्यात गेल्या २२ दिवसापासून भारनियमन होत नसल्याची, ऊर्जामंत्र्यांची माहिती
ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्र येऊन केलेलं कार्य आणि योग्य नियोजनामुळे, राज्यात गेल्या २२ दिवसापासून भारनियमन होत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या आदिवासी दुर्गम भागात नवीन ३३ केव्ही डहाळेवाडी उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा काल राऊत यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. अनेक ग्राहक इतर सेवांचे आधी पैसे मोजतात मात्र वीज बिल भरताना दुय्यम स्थान देतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विजेचा वापर काटकसरीनं करावा, असं आवाहन राऊत यांनी यावेळी केलं.