ABVP स्थापना दिनानिमित्त अमळनेरमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची आठवण – स्मिता वाघ यांच्यासह अनेक कार्तिक कार्यकर्त्यांची वाटचाल प्रेरणादायी..
अमळनेर : विक्की जाधव.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) स्थापना दिवस ९ जुलै रोजी संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अमळनेरमध्ये एकेकाळी एबीव्हीपीच्या कार्यातून सामाजिक जाणीवा निर्माण करणाऱ्या कार्तिक कार्यकर्त्यांची आठवण ताजी होत आहे.
यात सध्याच्या सद्याचे खासदार असलेल्या स्मिता वाघ यांच्यासह अनेक प्रभावी नेतृत्व घडले. ज्यात रतन कांबळे, धीरज वैष्णव सर, दिनेश नाईक, पंडित नाईक, कल्पेश पाटील, राहुल पाटील, साधना वैराळे, वीरभूषण पाटील, शैलेश पाटील, कृष्णा पाटील, विक्की जाधव, विवेक सूर्यवंशी, योगेश शार्दूल, रश्मी, गौरी, कविता पाटील. अशा अनेक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत आवाज उठवला आणि परिसरात सकारात्मक चळवळी उभ्या केल्या.
आज या स्थापना दिनानिमित्त एबीव्हीपीची ही विचारधारा पुन्हा नव्या जोमात पुढे नेताना, हे सर्व माजी कार्यकर्ते नव्या पिढीला मार्गदर्शनाचे स्रोत ठरत आहेत. “छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती” हे ब्रीद अंगीकारून त्यांनी घडवलेली वाटचाल ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.