पत्रकारांना मंत्रालयात सकाळपासून प्रवेश – गृह विभागाचे परिपत्रक मागे
मार्मिक न्यूज नेटवर्क :
गृह विभागाने २४ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, अधिस्वीकृतीधारक व अन्य पत्रकारांना दुपारी २ नंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार होता.
या निर्णयामुळे पत्रकारांच्या कामकाजावर मर्यादा येणार होत्या. या निर्णयाविरोधात वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या परिपत्रकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि गृह विभागाला तातडीने पत्रक मागे घेण्याचे आदेश दिले.
त्यामुळे गृह विभागाने आज हे वादग्रस्त परिपत्रक मागे घेतले आहे. यामुळे आता पूर्वीप्रमाणेच पत्रकारांना सकाळपासून मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.